राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:18 PM2018-05-25T17:18:02+5:302018-05-25T17:18:02+5:30

राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज वविलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

Mahavitaran's Abhay Yojna for 97 thousand permanent power supply breaks in the state | राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना 

राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना 

googlenewsNext
ठळक मुद्दे१ जून २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीरथकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल

सोलापूर :-  वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेत सहभागी होणाºया औद्योगिक ग्राहकांच्यामुळ थकबाकीवरील व्याज व विलंबआकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज वविलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. अशाग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यातमुळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जूलै २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८  या दरम्यान ग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम वव्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.
 

जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षापेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्णभरल्यास त्या ग्राहकाला १०० टक्केव्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जेन्यायालयीन प्रकरण १२ वर्षेपर्यंतचे आहेव न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिलीआहे. अशा ग्राहकांनी एका टप्प्यातडिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्केव्याजमाफीची सूट मिळणार आहे. या सर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्चसंबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.

 ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख/नेटपेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत  ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे़ या योजनेत १ जून २०१८ पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केलेआहे.

Web Title: Mahavitaran's Abhay Yojna for 97 thousand permanent power supply breaks in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.