शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

महाराष्ट्राची चमक-धमक मुंबईपुरती मर्यादित : सुभाषिनी अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:45 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भाजप सरकार अन् विरोधी पक्षावर टीका

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरातसुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत

सोलापूर : महाराष्ट्रात शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ या आत्महत्या मागील सरकारच्या चुकांमुळे होत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे अत्यंत निंदनीय आहे. नोटाबंदीने कोणाचा फायदा झाला आणि भारताला याचा काय फायदा झाला, हे सरकारला सांगता आले नाही. एकीकडे सरकार म्हणते बँकेत खाते उघडा आणि दुसरीकडे बँकेतील व्यवहारावर सरकार मर्यादा घालते, हे कशाचे लक्षण आहे़ महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे़ महाराष्ट्राची चमक-धमक केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे, असा टोला माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी लगावला.

सध्या ईव्हीएममध्ये घोळ आहे़, असे मी काही प्रमाणात मानते़ पण याच मशीनच्या साहाय्याने भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत, असे म्हणता येणार नाही़ कारण दक्षिण राज्यात भाजपला फारसे यश मिळाले नाही़ सध्या निवडणूक आयोगाकडून लोकशाहीला धोका आहे़ आयोगाकडून निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात निवडणुका होणे गरजेचे आहे़ तसे होत नाही़ निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपली असून, आयोगाची स्वायत्तता आता भाजपच्या हाती असल्याची टीका माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़  यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली़ सुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत.

त्या म्हणाल्या, आजच्या निवडणुका हे कशाच्या आधारावर होत आहेत़ तर राममंदिर, पाकिस्तानीचा द्वेष आणि ३७० कलम रद्द या विषयावर होत आहेत, हे चुकीचे आहे़ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर निवडणुका होणे अपेक्षित आहे़ सरकार याकडे लक्षच देत नाही़ दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या संसदेत मजबूत विरोधी पक्षदेखील अस्तित्वात नाही़ राज्यात अनेक महिन्यांपासून दुष्काळ असून, यामुळे लोकांचे हाल होताहेत़ जनावरे मरताहेत़ यावर वेळीच उपाययोजना करणे सरकारचे काम आहे़ मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सध्यस्थितीवरदेखील अली यांनी भाष्य करत यास फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण