शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महाराष्ट्राची चमक-धमक मुंबईपुरती मर्यादित : सुभाषिनी अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:45 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भाजप सरकार अन् विरोधी पक्षावर टीका

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरातसुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत

सोलापूर : महाराष्ट्रात शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ या आत्महत्या मागील सरकारच्या चुकांमुळे होत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे अत्यंत निंदनीय आहे. नोटाबंदीने कोणाचा फायदा झाला आणि भारताला याचा काय फायदा झाला, हे सरकारला सांगता आले नाही. एकीकडे सरकार म्हणते बँकेत खाते उघडा आणि दुसरीकडे बँकेतील व्यवहारावर सरकार मर्यादा घालते, हे कशाचे लक्षण आहे़ महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे़ महाराष्ट्राची चमक-धमक केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे, असा टोला माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी लगावला.

सध्या ईव्हीएममध्ये घोळ आहे़, असे मी काही प्रमाणात मानते़ पण याच मशीनच्या साहाय्याने भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत, असे म्हणता येणार नाही़ कारण दक्षिण राज्यात भाजपला फारसे यश मिळाले नाही़ सध्या निवडणूक आयोगाकडून लोकशाहीला धोका आहे़ आयोगाकडून निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात निवडणुका होणे गरजेचे आहे़ तसे होत नाही़ निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपली असून, आयोगाची स्वायत्तता आता भाजपच्या हाती असल्याची टीका माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़  यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली़ सुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत.

त्या म्हणाल्या, आजच्या निवडणुका हे कशाच्या आधारावर होत आहेत़ तर राममंदिर, पाकिस्तानीचा द्वेष आणि ३७० कलम रद्द या विषयावर होत आहेत, हे चुकीचे आहे़ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर निवडणुका होणे अपेक्षित आहे़ सरकार याकडे लक्षच देत नाही़ दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या संसदेत मजबूत विरोधी पक्षदेखील अस्तित्वात नाही़ राज्यात अनेक महिन्यांपासून दुष्काळ असून, यामुळे लोकांचे हाल होताहेत़ जनावरे मरताहेत़ यावर वेळीच उपाययोजना करणे सरकारचे काम आहे़ मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सध्यस्थितीवरदेखील अली यांनी भाष्य करत यास फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण