शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

महाराष्ट्राची चमक-धमक मुंबईपुरती मर्यादित : सुभाषिनी अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:45 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भाजप सरकार अन् विरोधी पक्षावर टीका

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरातसुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत

सोलापूर : महाराष्ट्रात शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ या आत्महत्या मागील सरकारच्या चुकांमुळे होत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे अत्यंत निंदनीय आहे. नोटाबंदीने कोणाचा फायदा झाला आणि भारताला याचा काय फायदा झाला, हे सरकारला सांगता आले नाही. एकीकडे सरकार म्हणते बँकेत खाते उघडा आणि दुसरीकडे बँकेतील व्यवहारावर सरकार मर्यादा घालते, हे कशाचे लक्षण आहे़ महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे़ महाराष्ट्राची चमक-धमक केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे, असा टोला माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी लगावला.

सध्या ईव्हीएममध्ये घोळ आहे़, असे मी काही प्रमाणात मानते़ पण याच मशीनच्या साहाय्याने भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत, असे म्हणता येणार नाही़ कारण दक्षिण राज्यात भाजपला फारसे यश मिळाले नाही़ सध्या निवडणूक आयोगाकडून लोकशाहीला धोका आहे़ आयोगाकडून निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात निवडणुका होणे गरजेचे आहे़ तसे होत नाही़ निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपली असून, आयोगाची स्वायत्तता आता भाजपच्या हाती असल्याची टीका माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़  यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली़ सुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत.

त्या म्हणाल्या, आजच्या निवडणुका हे कशाच्या आधारावर होत आहेत़ तर राममंदिर, पाकिस्तानीचा द्वेष आणि ३७० कलम रद्द या विषयावर होत आहेत, हे चुकीचे आहे़ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर निवडणुका होणे अपेक्षित आहे़ सरकार याकडे लक्षच देत नाही़ दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या संसदेत मजबूत विरोधी पक्षदेखील अस्तित्वात नाही़ राज्यात अनेक महिन्यांपासून दुष्काळ असून, यामुळे लोकांचे हाल होताहेत़ जनावरे मरताहेत़ यावर वेळीच उपाययोजना करणे सरकारचे काम आहे़ मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सध्यस्थितीवरदेखील अली यांनी भाष्य करत यास फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण