शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

महाराष्ट्र सरकारचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद, भाजप सरकार ढोगी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:09 IST

भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे.

ठळक मुद्देसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरणदीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज दि १८ : भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे. कारण सहकाराकडे बघण्याचा भाजप सरकारचा दृष्टिकोन संशयास्पद असून हे सरकार ढोंगी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जलसंपदा मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. विजयसिंंह मोहिते-पाटील, आ़ दत्तात्रय भरणे, आ़ दीपक चव्हाण, आ़ नारायण पाटील, आ़ बबनराव शिंंदे, आ़ हनुमंत डोळस, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आ़ विनायकराव पाटील, धनाजी पाटील, माजी खा़ रणजितसिंंह मोहिते-पाटील, माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंंह माने-पाटील, मदनसिंंह मोहिते-पाटील, राजूबापू पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि. प. सदस्या स्वरूपराणी मोहिते-पाटील, राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, तालुकाध्यक्षा फातिमा पाटावाला, रमेश बारसकर, उमेश पाटील, विक्रांत माने, प्रकाश चवरे उपस्थित होते. प्रारंभी स़ म़ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, राज्याच्या समृध्दीला सहकाराच्या चळवळीने हातभार लावला, विकासाचा पाया रचला. ग्रामीण भागाला खºया अर्थाने विकासाची ओळख सहकार चळवळीनेच करून दिली. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असेल तर तो सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा. आज भाजपा सरकार सहकाराच्या मुळावर उठले आहे. बाजार समिती, साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत येऊन मोडीत निघतील, याकडे सरकार लक्ष पुरवते आहे. हे सरकार फसवे आहे. धनगर, मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारने फसवले आहे. समित्या, चौकशा आणि अभ्यास या गोंडस नावाखाली सरकारने लोकांना उल्लू बनवले असल्याचे ते म्हणाले. सुनील तटकरे म्हणाले, निकष आणि तत्वत: या शब्दांचा घोळ घालून सरकारने शेतकºयांना कर्जमाफी प्रकरणात फसवले आहे. आयात आणि निर्यातीचे चुकीचे धोरण राबवून शेतकºयांचे खच्चीकरण केले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी जर सरकारला प्रामाणिकपणे साजरी करायची असेल तर त्यांनी शेतकºयांना फसवणे बंद केले पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाºया उजनीच्या पाणी वाटपाचा तिढा सोडवून शेतकºयांना पाणी टंचाईतून वाचवले पाहिजे. -------------------दीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले- सरकारची साखर कारखानदारीबद्दलची धोरणे चुकीची आहेत. गतवर्षी सरकारने गरज नसताना ८ लाख मे. टन साखर आयात केली; मात्र देशातील साखर निर्यात करताना ते सवलत देत नाहीत. कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला नाही. ३ हजार ७०० रूपयांवरची साखर आज ३ हजार १०० रूपयांवर येऊन ठेपली आहे. असेच जर चालू राहिले तर साखर कारखाने मोडीत निघतील, असे अजित पवार यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवार