शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:39 IST

प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असं वक्तव्य करुन सुशीलकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे संकेत दिलेत. सोलापूरच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला आहे. 

यावर बोलताना राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशात हिटलरशाही वाढतेय, शिवसेनेनेही सामना अग्रलेखातून हीच भूमिका मांडली आहे, त्यामुळे देशातील हिटलरशाहीविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर चांगलेच आहे. जातियवादी शक्तींना रोखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण यावर भाष्य करणं जितेंद्र आव्हाडांनी टाळलं. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीहीभाजपा-शिवसेना या जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच ऊर्जा आहे. आगामी निवडणुकीत चमत्कार नक्की दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा सुरु होती. मात्र राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाचं वृत्त तेव्हा फेटाळून लावलं होतं. देशातील वातावरण एकाच पक्षाच्या बाजूने वाहत असताना राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावं असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मत मांडले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे स्वत:चे अस्तित्व असून ते अस्तित्व कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलं होतं.  

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019