शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 10:52 IST

दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Pandharpur Vidhan Sabha ( Marathi News ) :पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे या मतदारसंघावरचा हक्क कोण सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असे चित्र रंगले होते. परंतु भालके यांनी दिल्लीवारी करून काँग्रेसकडून एबी फार्म मिळविला आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांचे थेट लढत होईल, असे वाटत होते. दरम्यान, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सध्या वेगळीच चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. या दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांचं काय आहे म्हणणं?

"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून अर्ज भरण्यात आले आहेत. अर्ज मागे घेण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत वरूनच निर्णय होणार आहे," असं मत काँग्रेस उमेदवार आणि विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी मांडलं आहे.

दरम्यान, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने पक्षाकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. यामुळे पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे," अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी मांडली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pandharpur-acपंढरपूरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस