शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

 प्रेम दिवस...भारतीय संस्कृतीला तिलांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 10:53 IST

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात ...

ठळक मुद्देआजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चाललेआपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात आले की, १४ फेब्रुवारी जवळ आलेला दिसतो. आजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चालले असून मदर्स डे, फादर्स डे, फ्रेन्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे असे रोज कुठले ना कुठले डे साजरे करण्यातच ते धन्यता मानत आहेत. यामुळे आपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही.

परकीय लोक आपली संस्कृती अभ्यासताना, शाकाहार करू लागलेत, त्यांच्याकडील स्त्रियांना तोकडे कपडे सोडून आपल्या अंगभर चोपून चोपून बसणाºया नऊवारीचं आकर्षण वाटू लागले आहे. त्या स्त्रिया कुणी तमाशावर अभ्यास करतंय तर कुणी बायका पारंपरिक वेशभूषा करून आषाढी पायी वारीला जाण्यात धन्य होऊ लागल्या आहेत. याउलट आपली तरुण पिढी भारतीय ज्ञानाने विद्याविभूषित होऊन आपल्या म्हाताºया आई-वडिलांसह भारतमातेला परके करून आपल्या ज्ञानाचा परदेशाला फायदा देत गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांच्या आकर्षणाने तिकडेच स्थायिक होण्यात धन्यता मानत आहेत. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, न करणे याच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने याची तीव्रतेने आठवण झाली.

मला ‘व्हॅलेंटाईन डे’ ज्याला मी प्रेम दिवस म्हणतो, तो आला की मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं ! तुमचं नी आमचं अगदी सेम असतं’, या कवितेची तीव्रतेने आठवण होते. जी नुकतीच वयात येऊ लागलेली ही तरुण मंडळी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेशताना, निसर्ग नियमाप्रमाणे भिन्नलिंगी व्यक्तीविषयी ओढ, आकर्षण वाढू लागले की जे फक्त शारीरिक असते, त्यालाच प्रेम समजून बसतात. त्यांना प्रेम कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसतं. त्यांना बरोबरचा मित्र किंवा मैत्रिण सिनेनट किंवा सिनेनटी वाटू लागते.

लैंगिक शिक्षणाच्या अभावाने, उदासीनतेमुळे हे घडते. आई, वडील, शिक्षक, सामाजिक, राजकीय दबाव या साºयांना झुगारून ते निरनिराळे डावपेच लढवून तो १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करतातच आणि त्यात त्यांना जग जिंकल्याचा आनंद मिळतो. ‘प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे’ हे यांना समजतच नाही. जर आपण एखाद्यावर जर खरेखुरे प्रेम करत असू तर त्याला ते व्यक्त करण्यासाठी विशिष्ट महिना, दिवस, तारखेचे बंधन कशाला हवे ? त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची काही गरज नाही. प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षण न राहता किंवा त्या व्यक्तीच्या बाह्यरुपावर न करता आंतरिक ओढीने मनापासून केलं तर ते नक्की यशस्वी होतं. पण, त्यात शारीरिक आकर्षण आणि तारुण्यसुलभ भावना आली तर तिथे त्या प्रेमाला फक्त आणि फक्त वासनेचा दर्पच येतो.

आपलं प्रेम कुसुमाग्रजांच्या ‘प्रेम असावे भिल्लासारखे..... ’ या ओळीप्रमाणे खरं असावं. तुमचं प्रेम खरं असेल तर ते सर्व संकटातून तावून सुलाखून निघते व कायम टिकते. त्यावेळी तुम्ही विरोधकांना, ‘प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?’ असं ठणकावून विचारू शकता. आपली महान भारतीय संस्कृती समजावून घ्या. परकियांच्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण जरूर करा पण मेणबत्ती फुंकून, दिवे विझवून असे दिवस साजरे करू नका. आपल्याकडे सणवार, वाढदिवस याला छानपैकी तबकात दोन निरांजन तेलवाती घालून ठेवतात.

हळद-कुंकू, अक्षता घेऊन छान औक्षण केलं जातं. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणे ही आपली संस्कृती आहे. पाश्चात्यांच्या अनुनयामध्ये भारतीय संस्कृतीला फक्त आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या ओळी बनवून ठेवू नका. आपली ही संस्कृती जपतानाच असे प्रेम करा की, पौराणिक कथेतल्या सावित्रीने यमदेवाकडून आपल्या नवºयाचे, सत्यवानाच्या प्राणाचे जीवदान घेतले, तिच्या प्रेमापुढे यमदेव हरले. अशा खºया प्रेमापुढे तुम्हाला प्रेम दिवस, व्हॅलेंटाईन डे फक्त १४ फेब्रुवारीला साजरा करण्याची गरज पडणार नसून दोघातील निखळ, निर्व्याज प्रेमामुळे ते प्रेम एक दिवसात दिलेल्या गुलाबासारखे सुकून न जाता ताजे टवटवीत राहील आणि तो एकच दिवस व्हॅलेंटाईन डे न होता रोजचाच दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा करता येईल.- गिरीश दुनाखे(लेखक साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे