शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

 प्रेम दिवस...भारतीय संस्कृतीला तिलांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 10:53 IST

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात ...

ठळक मुद्देआजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चाललेआपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात आले की, १४ फेब्रुवारी जवळ आलेला दिसतो. आजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चालले असून मदर्स डे, फादर्स डे, फ्रेन्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे असे रोज कुठले ना कुठले डे साजरे करण्यातच ते धन्यता मानत आहेत. यामुळे आपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही.

परकीय लोक आपली संस्कृती अभ्यासताना, शाकाहार करू लागलेत, त्यांच्याकडील स्त्रियांना तोकडे कपडे सोडून आपल्या अंगभर चोपून चोपून बसणाºया नऊवारीचं आकर्षण वाटू लागले आहे. त्या स्त्रिया कुणी तमाशावर अभ्यास करतंय तर कुणी बायका पारंपरिक वेशभूषा करून आषाढी पायी वारीला जाण्यात धन्य होऊ लागल्या आहेत. याउलट आपली तरुण पिढी भारतीय ज्ञानाने विद्याविभूषित होऊन आपल्या म्हाताºया आई-वडिलांसह भारतमातेला परके करून आपल्या ज्ञानाचा परदेशाला फायदा देत गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांच्या आकर्षणाने तिकडेच स्थायिक होण्यात धन्यता मानत आहेत. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, न करणे याच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने याची तीव्रतेने आठवण झाली.

मला ‘व्हॅलेंटाईन डे’ ज्याला मी प्रेम दिवस म्हणतो, तो आला की मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं ! तुमचं नी आमचं अगदी सेम असतं’, या कवितेची तीव्रतेने आठवण होते. जी नुकतीच वयात येऊ लागलेली ही तरुण मंडळी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेशताना, निसर्ग नियमाप्रमाणे भिन्नलिंगी व्यक्तीविषयी ओढ, आकर्षण वाढू लागले की जे फक्त शारीरिक असते, त्यालाच प्रेम समजून बसतात. त्यांना प्रेम कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसतं. त्यांना बरोबरचा मित्र किंवा मैत्रिण सिनेनट किंवा सिनेनटी वाटू लागते.

लैंगिक शिक्षणाच्या अभावाने, उदासीनतेमुळे हे घडते. आई, वडील, शिक्षक, सामाजिक, राजकीय दबाव या साºयांना झुगारून ते निरनिराळे डावपेच लढवून तो १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करतातच आणि त्यात त्यांना जग जिंकल्याचा आनंद मिळतो. ‘प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे’ हे यांना समजतच नाही. जर आपण एखाद्यावर जर खरेखुरे प्रेम करत असू तर त्याला ते व्यक्त करण्यासाठी विशिष्ट महिना, दिवस, तारखेचे बंधन कशाला हवे ? त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची काही गरज नाही. प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षण न राहता किंवा त्या व्यक्तीच्या बाह्यरुपावर न करता आंतरिक ओढीने मनापासून केलं तर ते नक्की यशस्वी होतं. पण, त्यात शारीरिक आकर्षण आणि तारुण्यसुलभ भावना आली तर तिथे त्या प्रेमाला फक्त आणि फक्त वासनेचा दर्पच येतो.

आपलं प्रेम कुसुमाग्रजांच्या ‘प्रेम असावे भिल्लासारखे..... ’ या ओळीप्रमाणे खरं असावं. तुमचं प्रेम खरं असेल तर ते सर्व संकटातून तावून सुलाखून निघते व कायम टिकते. त्यावेळी तुम्ही विरोधकांना, ‘प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?’ असं ठणकावून विचारू शकता. आपली महान भारतीय संस्कृती समजावून घ्या. परकियांच्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण जरूर करा पण मेणबत्ती फुंकून, दिवे विझवून असे दिवस साजरे करू नका. आपल्याकडे सणवार, वाढदिवस याला छानपैकी तबकात दोन निरांजन तेलवाती घालून ठेवतात.

हळद-कुंकू, अक्षता घेऊन छान औक्षण केलं जातं. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणे ही आपली संस्कृती आहे. पाश्चात्यांच्या अनुनयामध्ये भारतीय संस्कृतीला फक्त आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या ओळी बनवून ठेवू नका. आपली ही संस्कृती जपतानाच असे प्रेम करा की, पौराणिक कथेतल्या सावित्रीने यमदेवाकडून आपल्या नवºयाचे, सत्यवानाच्या प्राणाचे जीवदान घेतले, तिच्या प्रेमापुढे यमदेव हरले. अशा खºया प्रेमापुढे तुम्हाला प्रेम दिवस, व्हॅलेंटाईन डे फक्त १४ फेब्रुवारीला साजरा करण्याची गरज पडणार नसून दोघातील निखळ, निर्व्याज प्रेमामुळे ते प्रेम एक दिवसात दिलेल्या गुलाबासारखे सुकून न जाता ताजे टवटवीत राहील आणि तो एकच दिवस व्हॅलेंटाईन डे न होता रोजचाच दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा करता येईल.- गिरीश दुनाखे(लेखक साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे