शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:59 PM

सुस्ते परिसरातील शेतकरी संकटात; लाख रुपयांच्या मेहनतानाचा चुराडा; शेतात अन् बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी

ठळक मुद्देपरतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाहीआता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागलीकणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात

अंबादास वायदंडे

सुस्ते : चार महिने जिवापाड जपलेल्या मकेच्या पिकाला पंधरा दिवसांत परतीच्या पावसानं घेरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. उसाला जादा पाणी लागतं म्हणून तीन एकरात मका लावण्याचा निर्णय घेतला. पण कशाचं काय? संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय. त्याला कोण काय करणार? असा हताश सूर सुस्ते (ता. पंढरपूर)च्या हिंदुराव अडसुळ यांनी शेतातल्या बांधावर पोहोचलेल्या ‘लोकमत’च्या चमूशी बोलताना व्यक्त केला. 

भकास चेहºयानं आपली व्यथा मांडताना हिंदुराव अडसुळ म्हणाले.. चार महिन्यांपूर्वी मेहनतीसह एक लाख रुपये खर्च करून अ‍ॅडव्हान्टा ९२:९६ या जातीच्या मकेची लागवड केली. कमी पाणी असल्याने रात्रीचा दिवस करून मकेला काटकसरीने पाणी दिले. लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या होत्या. मकेच्या पिकाला नजर लागेल, असे पीक शेतात आले होते.  पिकाचे पूर्ण दिवस झाल्यानंतर कणसांची काढणी सुरू होती. मकेच्या ताटाची कणसेही मोडून शेतात जागोजागी टाकली होती. पण कणसे शेतातून उचलण्याअगोदरच परतीच्या पावसाने जोर धरला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले. डबडबल्या डोळ्यांनी हिंदुरावांनी आपलं गाºहाणं मांडलं. 

परतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाही. आता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागली आहे, तर काही कणसांना मोड आले आहेत. कणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात असल्याने ते बघण्याशिवाय काहीही करता येत नसल्याची खंत हिंदुराव अडसुळ यांनी व्यक्त केली.

मकेच्या पिकापासून १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते. मात्र परतीच्या पावसात सापडल्याने कणसं पूर्ण काळी पडली, बुरशी लागली व कणसाला मोड आले आहेत. त्यामुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे ३ लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची हमी होती. परंतु अवकाळी पावसाने जोर धरल्याने मकेच्या पिकाला खर्च केला तेवढासुद्धा निघत नसल्याचे अडसुळ यांनी सांगितले. परतीच्या पावसाने सुस्ते परिसरात फळबागेचे व इतर पिकांचे नुससान झालेल्या पिकांचे शासनामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अडसुळ यांच्या मकेच्या शेतात पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक राहुल मोरे, तलाठी प्रकाश गुजरे, ग्रामसेवक विष्णू गवळी, हनुमंत कवळे, कोतवाल दिगंबर बंगाळे, बिभीषण पाटील आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने सर्रास शेतकºयांनी मका, कांदा, फळबाग व इतर पिकांची लागवड केली. यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी एकही पाऊस झाला नव्हता. कमी पाण्यावर जगवलेली पिके परतीच्या पावसाने पूर्ण नष्ट झाली आहेत. या अवकाळीत आम्हा शेतकºयांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी.- हिंदुराव अडसुळमका उत्पादक शेतकरी, सुस्ते

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस