शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:02 IST

सुस्ते परिसरातील शेतकरी संकटात; लाख रुपयांच्या मेहनतानाचा चुराडा; शेतात अन् बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी

ठळक मुद्देपरतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाहीआता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागलीकणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात

अंबादास वायदंडे

सुस्ते : चार महिने जिवापाड जपलेल्या मकेच्या पिकाला पंधरा दिवसांत परतीच्या पावसानं घेरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. उसाला जादा पाणी लागतं म्हणून तीन एकरात मका लावण्याचा निर्णय घेतला. पण कशाचं काय? संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय. त्याला कोण काय करणार? असा हताश सूर सुस्ते (ता. पंढरपूर)च्या हिंदुराव अडसुळ यांनी शेतातल्या बांधावर पोहोचलेल्या ‘लोकमत’च्या चमूशी बोलताना व्यक्त केला. 

भकास चेहºयानं आपली व्यथा मांडताना हिंदुराव अडसुळ म्हणाले.. चार महिन्यांपूर्वी मेहनतीसह एक लाख रुपये खर्च करून अ‍ॅडव्हान्टा ९२:९६ या जातीच्या मकेची लागवड केली. कमी पाणी असल्याने रात्रीचा दिवस करून मकेला काटकसरीने पाणी दिले. लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या होत्या. मकेच्या पिकाला नजर लागेल, असे पीक शेतात आले होते.  पिकाचे पूर्ण दिवस झाल्यानंतर कणसांची काढणी सुरू होती. मकेच्या ताटाची कणसेही मोडून शेतात जागोजागी टाकली होती. पण कणसे शेतातून उचलण्याअगोदरच परतीच्या पावसाने जोर धरला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले. डबडबल्या डोळ्यांनी हिंदुरावांनी आपलं गाºहाणं मांडलं. 

परतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाही. आता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागली आहे, तर काही कणसांना मोड आले आहेत. कणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात असल्याने ते बघण्याशिवाय काहीही करता येत नसल्याची खंत हिंदुराव अडसुळ यांनी व्यक्त केली.

मकेच्या पिकापासून १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते. मात्र परतीच्या पावसात सापडल्याने कणसं पूर्ण काळी पडली, बुरशी लागली व कणसाला मोड आले आहेत. त्यामुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे ३ लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची हमी होती. परंतु अवकाळी पावसाने जोर धरल्याने मकेच्या पिकाला खर्च केला तेवढासुद्धा निघत नसल्याचे अडसुळ यांनी सांगितले. परतीच्या पावसाने सुस्ते परिसरात फळबागेचे व इतर पिकांचे नुससान झालेल्या पिकांचे शासनामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अडसुळ यांच्या मकेच्या शेतात पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक राहुल मोरे, तलाठी प्रकाश गुजरे, ग्रामसेवक विष्णू गवळी, हनुमंत कवळे, कोतवाल दिगंबर बंगाळे, बिभीषण पाटील आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने सर्रास शेतकºयांनी मका, कांदा, फळबाग व इतर पिकांची लागवड केली. यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी एकही पाऊस झाला नव्हता. कमी पाण्यावर जगवलेली पिके परतीच्या पावसाने पूर्ण नष्ट झाली आहेत. या अवकाळीत आम्हा शेतकºयांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी.- हिंदुराव अडसुळमका उत्पादक शेतकरी, सुस्ते

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस