शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

‘लोकमत बांधावर’; सडलेला कांदा बघायची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:05 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसार; रानमसलेतील शेतकºयांच्या डोळ्यात पाणीच पाणी...

ठळक मुद्दे- परतीच्या पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान-  प्रशासनाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू- शेतकºयांना त्वरीत भरपाई देण्याची शेतकºयांची प्रशासनाकडे मागणी

अरुण बारसकर 

सोलापूर: टँकरच्या पाण्याने रोप जोपासले, तुटपुंज्या पाण्यावर कांद्याची लागवड केली, कधी रिमझिम तर कधी जोराचा पाऊस पडल्याने कांदा पीक जोमात आले.  अन् आॅक्टोबरमध्ये महिनाभर पावसाची संततधार सुरू झाली. आता रानमसलेकरांना डोळ्यात पाणी आणून सडलेला कांदा पाहण्याची वेळ आली आहे.

रानमसले गावात प्रामुख्याने कांदा व ज्वारी हीच पिके घेतली जातात.  यंदाही अकराशेहून अधिक एकरावर कांदा लागवड झाली आहे. कांद्याचे गाव अशी ओळख असलेल्या गावातील अतुल गरड, पांडुरंग शिंदे, सोन्याबापू गरड, नागनाथ चव्हाण, शहाजी गरड, शिवाजी करंडे, हणुमंत गरड या शेतकºयांच्या कांद्याचे पीक पाहिले असता पावसाचे परिणाम काय असू शकतात, हे लक्षात येते. 

गावाची एकही दिशा अशी नाही की तेथे कांदा दिसत नाही.  मात्र यावर्षी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात पाऊस पडत राहिल्याने कांदा पाण्यातच नासू लागल्याचे पाहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

पंचनामे अन् धो..धो पाऊस- सोमवारी रानमसले गावात तलाठी एस.ए. गवळी,  कृषी सहायक सुवर्णा नरगिरे हे बांधावर जाऊन कांदा नुकसानीचे पंचानामे करीत होते. त्यातच दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. नको..नको.. म्हणण्याची वेळ आली असताना सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पंचनाम्याला व्यत्यय आला. मात्र रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे पंचनामे अंधार पडेपर्यंत कर्मचाºयांनी केले.  

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस