शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

टँकरने पाणीपुरवठा अन् घामांनी फुलवलेल्या बागेभोवतालचा लॉकडाउन हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:49 IST

बळीराजा धास्तावला; १५ लाखांच्या चिक्कूला लागलेलं कोरोनाचा ग्रहण सुटेना !

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घटसद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेतदरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

कारी : दहा वर्षांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग फुलवली़़़ प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करून ती जगवली़़़ आज फळं लगडली़़़ मात्र, कोरोनाचे अरिष्ट बळीराजावर ओढवले़़़ आज नऊ एकरावरील चिक्कूभोवती लॉकडाउनचा फास लागला आहे़़़ महिनाभरापासून कोरोनाचे ग्रहण सुटत नसल्याने १५ लाखांच्या चिक्कूची नासाडी होत आहे.

ही करुण कहाणी आहे बार्शी तालुक्यातील बेलगाव (मांडे) येथील प्रकाश पाटील या शेतकºयाची़ बळीराजा हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो़ काबाडकष्ट करून मानवाची भूक भागवतोय़ आपलं दु:ख समाजाला न दाखविता येणाºया संकटापुढे हार न मानता लढा देत राहिला आहे. असा हा अन्नदाता कोरोनाच्या महामारीतसुद्धा कष्टाची मोठ बांधून शेती पिकवण्याचा प्रयत्न करतोय़ लॉकडाउनच्या काळात देखील भाजीपाला, फळे व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. पिकवलेली फळं अन् भाजीपाला बाजारपेठेअभावी तो हतबल झाला आहे.

बार्शी तालुक्यात बेलगाव (मांडे) येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी अथक परिश्रमातून चिक्कूची बाग उभारली़ २००८ साली कृषी विभागाच्या फळझाड लागवड योजनेतून कालीपती जातीच्या चिक्कूची ९ एकरावर ३९० रोपं लावली़ भीषण टंचाईतसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करून ही बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली़ शेणखत फवारणीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी तीन लाख खर्च केले आहेत. चालू वर्षी शेणखतामुळे लगडून गेलेल्या चिक्कूच्या फांद्या जमिनीवर टेकल्या़ एकरी ३० टन फळ निघेल, असा अंदाज आहे़ मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण क्षेत्रातील २५० टन विक्रीयोग्य चिक्कू बाजारपेठ बंदअभावी गळून गेला आहे़ काढणीयोग्य फळाच्या ओझ्यामुळे अनेक फांद्या माना टाकल्या आहेत़ झाडाच्या खाली चिक्कूची नासाडी होऊ लागली आहे.

दोन महिने बाग जगवली टँकरवर - गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने उन्हाळ्यात पूर्ण दोन महिने टँकरने पाणीपुरवठा केला़ परिणामी सद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच श्रमाने बाग उभी केली अन् कोरोनाने हिरावून घेतली, अशी स्थिती शेतकºयांची झाली आहे.

देशपातळीवर विचार करता देशावर आलेल्या कुठल्याही संकटाचे पडसाद शेतकºयावर उमटतात. कोरोनाचा सर्वात मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे़ बळीराजाच्या या नुकसानीचा शासन स्तरावर विचार व्हायला हवा़ शेतकºयाला नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजाचा कणा मोडून पडेल़ - प्रकाश पाटील, चिक्कू उत्पादक 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी