शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

टँकरने पाणीपुरवठा अन् घामांनी फुलवलेल्या बागेभोवतालचा लॉकडाउन हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:49 IST

बळीराजा धास्तावला; १५ लाखांच्या चिक्कूला लागलेलं कोरोनाचा ग्रहण सुटेना !

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घटसद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेतदरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

कारी : दहा वर्षांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग फुलवली़़़ प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करून ती जगवली़़़ आज फळं लगडली़़़ मात्र, कोरोनाचे अरिष्ट बळीराजावर ओढवले़़़ आज नऊ एकरावरील चिक्कूभोवती लॉकडाउनचा फास लागला आहे़़़ महिनाभरापासून कोरोनाचे ग्रहण सुटत नसल्याने १५ लाखांच्या चिक्कूची नासाडी होत आहे.

ही करुण कहाणी आहे बार्शी तालुक्यातील बेलगाव (मांडे) येथील प्रकाश पाटील या शेतकºयाची़ बळीराजा हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो़ काबाडकष्ट करून मानवाची भूक भागवतोय़ आपलं दु:ख समाजाला न दाखविता येणाºया संकटापुढे हार न मानता लढा देत राहिला आहे. असा हा अन्नदाता कोरोनाच्या महामारीतसुद्धा कष्टाची मोठ बांधून शेती पिकवण्याचा प्रयत्न करतोय़ लॉकडाउनच्या काळात देखील भाजीपाला, फळे व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. पिकवलेली फळं अन् भाजीपाला बाजारपेठेअभावी तो हतबल झाला आहे.

बार्शी तालुक्यात बेलगाव (मांडे) येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी अथक परिश्रमातून चिक्कूची बाग उभारली़ २००८ साली कृषी विभागाच्या फळझाड लागवड योजनेतून कालीपती जातीच्या चिक्कूची ९ एकरावर ३९० रोपं लावली़ भीषण टंचाईतसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करून ही बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली़ शेणखत फवारणीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी तीन लाख खर्च केले आहेत. चालू वर्षी शेणखतामुळे लगडून गेलेल्या चिक्कूच्या फांद्या जमिनीवर टेकल्या़ एकरी ३० टन फळ निघेल, असा अंदाज आहे़ मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण क्षेत्रातील २५० टन विक्रीयोग्य चिक्कू बाजारपेठ बंदअभावी गळून गेला आहे़ काढणीयोग्य फळाच्या ओझ्यामुळे अनेक फांद्या माना टाकल्या आहेत़ झाडाच्या खाली चिक्कूची नासाडी होऊ लागली आहे.

दोन महिने बाग जगवली टँकरवर - गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने उन्हाळ्यात पूर्ण दोन महिने टँकरने पाणीपुरवठा केला़ परिणामी सद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच श्रमाने बाग उभी केली अन् कोरोनाने हिरावून घेतली, अशी स्थिती शेतकºयांची झाली आहे.

देशपातळीवर विचार करता देशावर आलेल्या कुठल्याही संकटाचे पडसाद शेतकºयावर उमटतात. कोरोनाचा सर्वात मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे़ बळीराजाच्या या नुकसानीचा शासन स्तरावर विचार व्हायला हवा़ शेतकºयाला नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजाचा कणा मोडून पडेल़ - प्रकाश पाटील, चिक्कू उत्पादक 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी