शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

टँकरने पाणीपुरवठा अन् घामांनी फुलवलेल्या बागेभोवतालचा लॉकडाउन हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:49 IST

बळीराजा धास्तावला; १५ लाखांच्या चिक्कूला लागलेलं कोरोनाचा ग्रहण सुटेना !

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घटसद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेतदरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

कारी : दहा वर्षांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग फुलवली़़़ प्रत्येक उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करून ती जगवली़़़ आज फळं लगडली़़़ मात्र, कोरोनाचे अरिष्ट बळीराजावर ओढवले़़़ आज नऊ एकरावरील चिक्कूभोवती लॉकडाउनचा फास लागला आहे़़़ महिनाभरापासून कोरोनाचे ग्रहण सुटत नसल्याने १५ लाखांच्या चिक्कूची नासाडी होत आहे.

ही करुण कहाणी आहे बार्शी तालुक्यातील बेलगाव (मांडे) येथील प्रकाश पाटील या शेतकºयाची़ बळीराजा हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो़ काबाडकष्ट करून मानवाची भूक भागवतोय़ आपलं दु:ख समाजाला न दाखविता येणाºया संकटापुढे हार न मानता लढा देत राहिला आहे. असा हा अन्नदाता कोरोनाच्या महामारीतसुद्धा कष्टाची मोठ बांधून शेती पिकवण्याचा प्रयत्न करतोय़ लॉकडाउनच्या काळात देखील भाजीपाला, फळे व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. पिकवलेली फळं अन् भाजीपाला बाजारपेठेअभावी तो हतबल झाला आहे.

बार्शी तालुक्यात बेलगाव (मांडे) येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी अथक परिश्रमातून चिक्कूची बाग उभारली़ २००८ साली कृषी विभागाच्या फळझाड लागवड योजनेतून कालीपती जातीच्या चिक्कूची ९ एकरावर ३९० रोपं लावली़ भीषण टंचाईतसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करून ही बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवली़ शेणखत फवारणीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी तीन लाख खर्च केले आहेत. चालू वर्षी शेणखतामुळे लगडून गेलेल्या चिक्कूच्या फांद्या जमिनीवर टेकल्या़ एकरी ३० टन फळ निघेल, असा अंदाज आहे़ मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण क्षेत्रातील २५० टन विक्रीयोग्य चिक्कू बाजारपेठ बंदअभावी गळून गेला आहे़ काढणीयोग्य फळाच्या ओझ्यामुळे अनेक फांद्या माना टाकल्या आहेत़ झाडाच्या खाली चिक्कूची नासाडी होऊ लागली आहे.

दोन महिने बाग जगवली टँकरवर - गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने उन्हाळ्यात पूर्ण दोन महिने टँकरने पाणीपुरवठा केला़ परिणामी सद्यस्थितीला दिवसाकाठी दोन ते अडीच हजार रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च के ले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे चालू हंगामात जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीतच श्रमाने बाग उभी केली अन् कोरोनाने हिरावून घेतली, अशी स्थिती शेतकºयांची झाली आहे.

देशपातळीवर विचार करता देशावर आलेल्या कुठल्याही संकटाचे पडसाद शेतकºयावर उमटतात. कोरोनाचा सर्वात मोठा आर्थिक फटका हा शेतकरी वर्गाला बसला आहे़ बळीराजाच्या या नुकसानीचा शासन स्तरावर विचार व्हायला हवा़ शेतकºयाला नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा जगाचा पोशिंदा बळीराजाचा कणा मोडून पडेल़ - प्रकाश पाटील, चिक्कू उत्पादक 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी