शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा, सोलापूरातील धर्मजागृती सभेत आमदार राजासिंह ठाकूर यांचे मत, सोलापुरात हिंदूंनी जागवली हिंदुत्त्वाची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:01 IST

सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे : राजासिंह ठाकूरअखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे : राजासिंह ठाकूरदेशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो : स्वाती खाडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी हिंदंूनी संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी सोलापुरात केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील पुंजाल क्रीडांगणावर आयोजित हिंदू धर्मजागृती सभेमध्ये ते बोलत होते.  यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाडये, समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मनोज खाडये आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. आपल्या भाषणातून आमदार ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. धर्मासाठी जातपात विसरुन एकत्र येण्याची  गरज आहे. अखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे. देश पुढे जाण्यासाठी धर्म सुरक्षित राहायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सद्गुरु  यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विरांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतीयांना आहे; मात्र त्यांना शौर्यहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो. हे रोखण्यासाठी प्रत्येक युवा-युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. मनोज खाडये म्हणाले, सध्या काही हिंदू प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. यामुळे धर्मांतर बंदीचा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. धर्मसभेला पोलिसांनी बंदोबस्त दिला, हे चांगले असून त्यांनी हाच बंदोबस्त आतंकवादी बनण्याच्या ठिकाणी पुरवायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली.  सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने झाला. दीपप्रज्वलनानंतर वेणूगोपाल जिल्ला पंतलु, भानुचंद्र चिप्पा, व्यंकटेश श्रीमल, श्रीनिवास जिल्ला यांनी वेद मंत्रपठण केले. सभेचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख आणि  संजय इंगळे यांनी   केले. या सभेसाठी पुंजाल मैदानावर मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी हजेरी लावली. ------------------------सुराज्य अभियानात सहभागी व्हा!- गेली ७० वर्षे देशाचा विकास करु असे सांगून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले,  मात्र आजपर्यंत देशातील दारिद्र्य, शेतकºयांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सुटल्या नाहीत. या देशातील भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्याने जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. त्याविरुद्ध आपण उभे राहायला हवे. या लोकशाहीत प्रबळ झालेल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ आरंभले आहे, त्यात सहभागी होण्याचे आवाहन  मनोज खाडये यांनी केले. 

टॅग्स :Solapurसोलापूर