शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा, सोलापूरातील धर्मजागृती सभेत आमदार राजासिंह ठाकूर यांचे मत, सोलापुरात हिंदूंनी जागवली हिंदुत्त्वाची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:01 IST

सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे : राजासिंह ठाकूरअखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे : राजासिंह ठाकूरदेशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो : स्वाती खाडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी हिंदंूनी संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी सोलापुरात केले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील पुंजाल क्रीडांगणावर आयोजित हिंदू धर्मजागृती सभेमध्ये ते बोलत होते.  यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाडये, समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मनोज खाडये आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. आपल्या भाषणातून आमदार ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. धर्मासाठी जातपात विसरुन एकत्र येण्याची  गरज आहे. अखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे. देश पुढे जाण्यासाठी धर्म सुरक्षित राहायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सद्गुरु  यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विरांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतीयांना आहे; मात्र त्यांना शौर्यहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो. हे रोखण्यासाठी प्रत्येक युवा-युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. मनोज खाडये म्हणाले, सध्या काही हिंदू प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. यामुळे धर्मांतर बंदीचा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. धर्मसभेला पोलिसांनी बंदोबस्त दिला, हे चांगले असून त्यांनी हाच बंदोबस्त आतंकवादी बनण्याच्या ठिकाणी पुरवायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली.  सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलनाने झाला. दीपप्रज्वलनानंतर वेणूगोपाल जिल्ला पंतलु, भानुचंद्र चिप्पा, व्यंकटेश श्रीमल, श्रीनिवास जिल्ला यांनी वेद मंत्रपठण केले. सभेचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख आणि  संजय इंगळे यांनी   केले. या सभेसाठी पुंजाल मैदानावर मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी हजेरी लावली. ------------------------सुराज्य अभियानात सहभागी व्हा!- गेली ७० वर्षे देशाचा विकास करु असे सांगून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले,  मात्र आजपर्यंत देशातील दारिद्र्य, शेतकºयांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सुटल्या नाहीत. या देशातील भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्याने जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. त्याविरुद्ध आपण उभे राहायला हवे. या लोकशाहीत प्रबळ झालेल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ आरंभले आहे, त्यात सहभागी होण्याचे आवाहन  मनोज खाडये यांनी केले. 

टॅग्स :Solapurसोलापूर