शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 12:48 PM

महाराष्ट्र, कामगार दिन विशेष; कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळून आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत

ठळक मुद्देकुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही.आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : नावाजलेल्या सोलापूरच्यावस्त्रोद्योगात मालकांकडून कामाची हमी नसल्याने नेहमीच कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रत्येक कारखान्यासमोर ‘कामगार पाहिजेत’, असे फलक झळकत आहेत.

महागाईचा वेढा सूत, रंग, वीज, पगार, वाहतूक खर्चाबरोबरच इतर उत्पादन खर्चालाही पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस वस्त्रोद्योग शेतीप्रमाणे आतबट्ट्यातच जात आहे. मंदीच्या नावाखाली मालाला उठाव नसल्याने गरज नसताना मालक कामगारांना सुट्टी देत आहेत. यातून कामाची शाश्वती मिळेना. वस्त्रोद्योग कामगारांच्या पत्नी विडी वळण्याकडे वळल्या आहेत. यामुळे प्रपंच भागविण्याइतपत त्यांना उत्पन्न मिळत आहे. यातून पुरूष मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय नवीन शिकलेल्या पिढींकडे उभारून आठ ते दहा तास श्रम करण्याची मानसिकता नाही.

मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करीत आहेत. शिकलेली मुले हैदराबाद, मुंबई, पुणे व बंगळुरू येथे नोकरीस जात आहेत. त्यातल्या त्यात अल्प शिक्षित मुलेही कमी श्रम असलेल्या चाटी गल्लीसह इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. नजरचुकीने कामगारांकडून फॉल्ट झाला, कांडी तुटली, धोटा गेला तर त्याची नुकसानभरपाई कारखानदार कामगारांकडून वसूल करतात. हा धोकाही कामगारांना नको आहे. शिवाय नोकरी आज आहे, उद्या नाही, अशी स्थिती या उद्योगात आहे. यामुळे कामगार वस्त्रोद्योगातील कामच नको, असे म्हणत आहेत.

कारखानदारांची मुलेही ‘आयटी’त- मंदी, महागाई, विक्री यातील धोका नको म्हणत दस्तुरखुद्द कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळत उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत. पूर्वी कारखाने असलेल्यांना मुली दिल्या जायच्या. पण आता कारखानदारांऐवजी नोकरदाराला लग्नासाठी अधिकच पसंती देण्यात येत आहे. यामुळे हा धोका पत्करण्याची मानसिकता कारखानदारांच्या मुलांमध्येही नसल्याचे टॉवेल निर्यातदार अशोक संगा यांनी सांगितले.

वस्त्रोद्योगात नवीन कामगार येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे श्रम करण्याचीही मानसिकता नाही. त्यांना जास्त सवलती हव्या आहेत. ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी आहे. यामुळे या क्षेत्रात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.-शेखर गुर्रम, टॉवेल उत्पादक

कुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही. आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत.- राजेश गोसकी,अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगjobनोकरी