शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:51 IST

औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतकºयांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे.

ठळक मुद्देऔज बंधाºयाचे एका काठावर कर्नाटक व दुसरे काठ महाराष्ट्रातविजयपूर जिल्हाधिकाºयांना पत्र देणार : आयुक्त ढाकणे

सोलापूर : औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतक-यांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. याबाबत विजयपूर जिल्हाधिकाºयांना पत्र देणार असल्याचे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले. 

उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज व चिंचपूर बंधारे साडेचार मीटर क्षमतेने भरले आहेत. यामुळे सोलापूरच्या दोन महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. पण कर्नाटकातील शेतक-यांनी बंधा-यातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू केल्याने बंधाºयातील पाणी दहा दिवस आधी संपेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती मिळताच आयुक्त डॉ. ढाकणे यांनी  औज बंधा-यास भेट दिली. त्यावेळी कर्नाटक भागातील शेतकरी मोठ्या संख्येने पंप लावून बंधा-यातील पाण्याचा उपसा करीत असल्याचे आढळले. बंधा-याचे पात्र जवळजवळ सहा किलोमीटर परिसरात आहे. इतक्या प्रमाणातील पंपाची संख्या लक्षात घेता बंधा-यातील पाण्याची पातळी दररोज वेगाने खाली जात आहे. 

औज बंधा-याचे एका काठावर कर्नाटक व दुसरे काठ महाराष्ट्रात आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांना फक्त दोन तास वीजपुरवठा दिला जात आहे. पण कर्नाटकात १२ तास वीजपुरवठा आहे. अशात शेतकरी ट्रॅक्टर, डिझेल इंजिन, जनरेटरचा वापर करून २४ तास पाण्याचा उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बेसुमार पाणी उपसा थांबविण्यासाठी विजयपूरच्या जिल्हाधिका-यांना पत्र देण्याचा सूचना सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांना दिल्या. चिंचपूर बंधा-याची हीच स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चिंचपूर बंधा-यातील पाणी खाली जाईल तसे औज बंधाºयातील पाणी या बंधा-यात घेण्यात येणार आहे. परतीच्या मार्गावर सोरेगाव ते टाकळी मार्गावरील जलवाहिनीची आयुक्तांनी पाहणी केली. हत्तूरजवळ या जलवाहिनीला मोठी गळती होत आहे. दोन ठिकाणच्या गळतीतून दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. ही गळती थांबविण्यासाठी २२ एप्रिलनंतर टाकळी जलवाहिनीवर शटडाऊन घ्या अशी सूचना आयुक्त डॉ. ढाकणे यांनी केली. 

एमआयडीसीसाठी दरवाढ अटळ- औज बंधा-यासाठी उजनीतून सोडलेल्या पाण्याचे अवाजवी बिल आकारत पाटबंधारे खात्याने मनपाची ५१ कोटींची थकबाकी दाखविली आहे. थकबाकीबाबत बोलताना आयुक्त ढाकणे यांनी केवळ दोन बंधाºयात साठा करून दिलेल्या पाण्याचे बिल मनपाला लागू होते. त्याप्रमाणे बिल भरले जात आहे. यापूर्वी भरलेल्या बिलाची ११ कोटींची जादा रक्कम पाटबंधारे खात्याकडे आहे. यातून या पाण्याचे बिल वजा करावे असे कळविले आहे. शासनाने उद्योगाला देण्यात येणाºया कच्च्या पाण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे चिंचोळी व अक्कलकोट रोड एमआयडीसीला देण्यात येणाºया पाणी बिलात वाढ करावी लागणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाKarnatakकर्नाटकFarmerशेतकरीWaterपाणीtheftचोरी