शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

कर्नाटकचे शेतकरी उचलतात सोलापूरच्या बंधा-यातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:51 IST

औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतकºयांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे.

ठळक मुद्देऔज बंधाºयाचे एका काठावर कर्नाटक व दुसरे काठ महाराष्ट्रातविजयपूर जिल्हाधिकाºयांना पत्र देणार : आयुक्त ढाकणे

सोलापूर : औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतक-यांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. याबाबत विजयपूर जिल्हाधिकाºयांना पत्र देणार असल्याचे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले. 

उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज व चिंचपूर बंधारे साडेचार मीटर क्षमतेने भरले आहेत. यामुळे सोलापूरच्या दोन महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. पण कर्नाटकातील शेतक-यांनी बंधा-यातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू केल्याने बंधाºयातील पाणी दहा दिवस आधी संपेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती मिळताच आयुक्त डॉ. ढाकणे यांनी  औज बंधा-यास भेट दिली. त्यावेळी कर्नाटक भागातील शेतकरी मोठ्या संख्येने पंप लावून बंधा-यातील पाण्याचा उपसा करीत असल्याचे आढळले. बंधा-याचे पात्र जवळजवळ सहा किलोमीटर परिसरात आहे. इतक्या प्रमाणातील पंपाची संख्या लक्षात घेता बंधा-यातील पाण्याची पातळी दररोज वेगाने खाली जात आहे. 

औज बंधा-याचे एका काठावर कर्नाटक व दुसरे काठ महाराष्ट्रात आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांना फक्त दोन तास वीजपुरवठा दिला जात आहे. पण कर्नाटकात १२ तास वीजपुरवठा आहे. अशात शेतकरी ट्रॅक्टर, डिझेल इंजिन, जनरेटरचा वापर करून २४ तास पाण्याचा उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बेसुमार पाणी उपसा थांबविण्यासाठी विजयपूरच्या जिल्हाधिका-यांना पत्र देण्याचा सूचना सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांना दिल्या. चिंचपूर बंधा-याची हीच स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चिंचपूर बंधा-यातील पाणी खाली जाईल तसे औज बंधाºयातील पाणी या बंधा-यात घेण्यात येणार आहे. परतीच्या मार्गावर सोरेगाव ते टाकळी मार्गावरील जलवाहिनीची आयुक्तांनी पाहणी केली. हत्तूरजवळ या जलवाहिनीला मोठी गळती होत आहे. दोन ठिकाणच्या गळतीतून दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. ही गळती थांबविण्यासाठी २२ एप्रिलनंतर टाकळी जलवाहिनीवर शटडाऊन घ्या अशी सूचना आयुक्त डॉ. ढाकणे यांनी केली. 

एमआयडीसीसाठी दरवाढ अटळ- औज बंधा-यासाठी उजनीतून सोडलेल्या पाण्याचे अवाजवी बिल आकारत पाटबंधारे खात्याने मनपाची ५१ कोटींची थकबाकी दाखविली आहे. थकबाकीबाबत बोलताना आयुक्त ढाकणे यांनी केवळ दोन बंधाºयात साठा करून दिलेल्या पाण्याचे बिल मनपाला लागू होते. त्याप्रमाणे बिल भरले जात आहे. यापूर्वी भरलेल्या बिलाची ११ कोटींची जादा रक्कम पाटबंधारे खात्याकडे आहे. यातून या पाण्याचे बिल वजा करावे असे कळविले आहे. शासनाने उद्योगाला देण्यात येणाºया कच्च्या पाण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे चिंचोळी व अक्कलकोट रोड एमआयडीसीला देण्यात येणाºया पाणी बिलात वाढ करावी लागणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाKarnatakकर्नाटकFarmerशेतकरीWaterपाणीtheftचोरी