शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कारंबा गाव कोरोनामुक्त; गावातील लोकांची पूर्वतपासणी ठरली फायद्याची

By appasaheb.patil | Updated: May 25, 2021 12:54 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील पहिलेच गाव

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : शहरापासून अवघ्या १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेले कारंबा गाव...लोकसंख्या जेमतेम ५ हजाराच्या आसपास...कोरोना महामारी सुरू झाली अन् कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाने कडक नियम जाहीर केले... प्रत्येक नियमांचे कडक पालन केले...गावातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित होऊ नये यासाठी सगळ्या गावाची काळजी घेतली. पूर्वतपासणी करून गावातील प्रत्येक इसमावर ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी कडक नजर ठेवून गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यास यश मिळविले.

दरम्यान, २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कारंबा गावातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय संसर्ग टाळण्यासाठी गावात औषधाची फवारणी, स्वच्छतेवर भर, सॅनिटायझर, मास्कचे प्रत्येक घरी वाटप केले. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक माहिती घेऊन रेकॉर्ड ठेवले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करून काही कालावधीसाठी त्या लोकांना क्वारंटाइन केले. कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जनजागृती, प्रचार व प्रसार केला.

कोरोना रुग्णसंख्येवर एक नजर...

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावात फक्त दोनच रुग्ण बाधित झाले होते. दुसरी लाट अचानक आली अन् गावातील २३ रुग्ण कोरोनाबाधित झाले. २३ पैकी १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली अन् ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सद्यस्थितीला कारंबा गावात एकही कोरोनाबाधित अथवा उपचारार्थ नागरिक कोणत्याही रुग्णालयात नाही. कारंबा गाव कोरोनामुक्त आहे.

अख्खं गाव काळजी करतंय...

गावातील एखादा नागरिक, महिला किंवा युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांची संपूर्ण टीम त्या कोरोनाबाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत होती. फोनवरून, समक्ष किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून त्या रुग्णास आवश्यक ती मदत करण्यास ग्रामपंचायतीने मागे-पुढे पाहिले नाही. गावातील प्रत्येक कुटुुंबाची ग्रामपंचायतीच्या संपूर्ण टीमने काळजी घेतली.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांचा सर्व्हे करून आजारी मुलांवर वेळेत उपचार कशा पद्धतीने करता येतील त्यादृष्टीने नियोजन करण्यात ग्रामपंचायत प्रशासन विचारविनिमय करीत आहे.

 

पहिल्या लाटेत गावात फक्त दोनच रुग्ण होते. तेही बरे होऊन खरे परतले. दुसरी लाट अचानक आल्याने गावातील रुग्णसंख्या वाढली; मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केल्याने गाव लवकरच कोरोनामुक्त झाले. आता तिसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. जात, धर्म, पंथ विसरून गावातील लोक संकटाच्या काळात माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. हेच कारंबा कोराेनामुक्तीचे यश आहे.

- कौशल्या सुतार, सरपंच, कारंबा ग्रामपंचायत

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत