शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कल्याणशेट्टी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी ...

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी एका दिवसात जर ९० मिलिमीटर पाऊस झाला तर प्रति हेक्टरी तब्बल ६६ हजार रुपये मिळत होते. त्यात बदल करून सध्याच्या सरकारने रोज २५ मिलिमीटर सलग पाच दिवस पाऊस पडला तरच विम्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. चार दिवस पाऊस पडला, शेवटच्या दिवशी पाऊस कमी पडला तर शेतकरी लाभापासून वंचित राहतील. फडणवीस सरकारच्या काळात २०१८ मध्ये ४२ कोटी तर २०१९ मध्ये ५४ कोटी रुपये फळपीकधारकांना विमा योजनेतून मिळालेले आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआर मुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

तसेच अक्कलकोट तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांचा जागा आठ असून केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे. सहायक तीन असून सर्व जागा रिक्त आहे. दवाखाने १५ असून एकाही ठिकाणी डॉक्टर नाही. तालुक्यात १ लाख ४० लहानमोठे जनावरे असून वर्षाकाठी अनेक लहान जनावरे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात ९९ टक्के पशुधन अधिकारी, कर्मचारी जागा भरलेले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात ९९ टक्के रिक्त आहेत. असा भेदभाव का, असा सवाल उपस्थित करून त्वरित सर्व जागा भरण्याची मागणी केली.

अबू आझमीच्या विषयावर आक्षेप

दरम्यान, आमदार अबू आझमी यांनी बाबरी मशीद विषयावर आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्धल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हरकत घेत निषेध व्यक्त केला. तसेच पटलावरील हा विषय काढून टाकण्याची मागणी केली. त्यावेळी सभागृहात काहीवेळ गोंधळ उडाला होता.