शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंत्यविधीला जाताना जीपच्या धडकेत वकील ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:51 IST

सोलापूर : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकलवरून जात असताना  ‘बीएमआयटी’ कॉलेजजवळ पाठीमागून येणाºया जीपने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वकिलाचा गुरुवारी मृत्यू ...

ठळक मुद्देमुलीचे लग्न होण्याआधीच घेतला निरोप...७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अपघात झाला होताअ‍ॅड. इस्माईल लालासाब शेख असे ठार झालेल्या वकिलाचे नाव

सोलापूर : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकलवरून जात असताना  ‘बीएमआयटी’ कॉलेजजवळ पाठीमागून येणाºया जीपने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वकिलाचा गुरुवारी मृत्यू झाला. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अपघात झाला होता.

अ‍ॅड. इस्माईल लालासाब शेख (वय ५२, रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) असे ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. अ‍ॅड. इस्माईल शेख यांच्या मामाच्या मुलीचे कवठे येथे निधन झाले होते. अंत्यविधी करण्यासाठी अ‍ॅड. ईस्माईल शेख हे पत्नीसोबत स्वत:च्या मोटरसायकलवरून जात होते. दोघे कवठे या गावाकडे जात असताना बीएमआयटी कॉलेजच्या अलीकडील आनंद नगर येथे पाठीमागून येणाºया जीपने जोरात धडक दिली. या धडकेत अ‍ॅड. ईस्माईल शेख व त्यांची पत्नी हे दोघे जखमी झाले. अ‍ॅड. ईस्माईल शेख यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. 

जखमी अवस्थेत त्यांना देगावजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी बुधवारी दुपारी २.३0 वाजता भाऊ मौला शेख यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता अ‍ॅड. ईस्माईल शेख यांचा मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. 

मुलीचे लग्न होण्याआधीच घेतला निरोप...- अ‍ॅड. ईस्माईल  शेख यांना पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. मोठ्या मुलीचे शिक्षण एमएस्सीपर्यंत झाले आहे. दुसरी मुलगी इंजिनिअर असून तिसरी मुलगी कॉमर्स शाखेत शिकत आहे. मोठ्या मुलीचे लग्न ठरले असून १ मे २0१९ रोजीची तारीख काढण्यात आली आहे. अ‍ॅड. ईस्माईल शेख यांनी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. मुलीचे लग्न होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

विनंती केल्यावर इस्माईल यांचा मोबाईल दिला....- सोमवारी दुपारी १२ वाजता अपघात झाला, दोघे पती-पत्नी जखमी झाल्यानंतर अ‍ॅड. ईस्माईल शेख हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हा अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ईस्माईल शेख यांच्या खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला होता. पत्नीने नातेवाईकांना कळवण्यासाठी मोबाईल पडला आहे तो द्या असे म्हणत होती; मात्र माणुसकी नसलेला व्यक्ती मोबाईल खिशात ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेत होता. हात जोडून विनंती करीत पत्नीने मोबाईलची मागणी केल्यानंतर अर्ध्या तासाने मोबाईल दिला. मोबाईलवरून पत्नीने नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. आपल्यासारख्या माणसाचा अपघात झाला आहे, तो तडफडत आहे. हे समोर दिसत असताना माणुसकी नसलेला व्यक्ती मोबाईल खिशात घालून शांतपणे बघ्याची भूमिका घेत होता.  

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातadvocateवकिलroad safetyरस्ते सुरक्षा