शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

तरुणांना जॉबची चिंता; महिलांना कोरोनाची भीती तर विद्यार्थी मानसिक तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 12:34 PM

विद्यार्थी मानसिक तणावात : जास्त ताण न घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

सोलापूर : कोरोनाच्या स्थितीमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आल्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे. परिणामी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावात जात आहे. यामुळे मनोविकारतज्ज्ञांकडील अपॉइंटमेंटस्‌ वाढलेल्या आहेत. यात तरुणांचे प्रमाण जास्त असून ते जॉबबद्दल चिंता करत आहेत, तर महिलांना कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची भीती सतावत आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली.

कोरोनाचा सर्वच वर्गातील लोकांवर परिणाम झाला आहे; पण त्यातल्या त्यात मध्यमवर्गाला जास्त मानसिक ताण निर्माण झाला आहे. उच्च वर्गातील लोकांना कोरोनाची जरी भीती असली तरी रोजगाराबद्दल त्यांना चिंता नाही आणि गरीब समुदायाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून थोडीफार मदत मिळत असल्यामुळे त्यांचा ताण थोडा कमी आहे; पण मध्यम वर्गातील जे सुशिक्षित तरुण आहेत ते इतरांना मदत मागू शकत नाहीत. कारण त्यांना सध्या मानसिकदृष्ट्या चांगले वाटत नाही. यामुळे सध्या सर्वात जास्त ताण मध्यमवर्गातील कुटुंबावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उच्च वर्गातील लोकांना ज्यांना कोरोना झालेला आहे, अशांना पुन्हा आपल्याला कोरोना होईल का? याची भीती वाटत आहे. यातूनच त्यांची झोप कमी होत आहे. तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी एक समान झाले आहेत. यातून त्यांना करिअरची चिंता लागली आहे. सोबत लहान मुले खेळण्यासाठी बाहेर जाण्यास घाबरत आहेत. यामुळे पालकांकडून दिलेला मोबाइल आणि टीव्ही हा त्यांचा भावविश्व झाला आहे तर महिलांमध्ये घरातील वृद्ध मंडळी गेलेल्या आहेत यामुळे मुलांचा सांभाळ कसा होईल. याची चिंता ते करत आहेत. यासाठी मनात कोरोनाची भीती न बाळगता सध्याचे वातावरण कुटुंबासोबत आनंदाने घालवावे व आपल्या अडचणीबाबत शांततेत विचार करावा व त्यातून मार्ग काढावा असे आवाहन डॉक्टर करत आहेत.

 

पुरुषांचे प्रश्न

  • १) सर नोकरी गेलेली आहे. यामुळे उदरनिर्वाहाचे साधन थांबले आहे. कोरोना कधी संपेल.
  • २) खूप कष्ट करून मी गाडी घेतली होती, पण नोकरी गेल्यामुळे गाडीचे हप्ते भरणे झाले नाही. यामुळे फायनान्सवाल्याने गाडी उचलली. मी काय करू?
  • ३) मला कोरोना झाला होता पुन्हा होईल का याची मला भीती वाटत आहे.

 

पुरुष शक्यतो व्यक्त होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये दडपण निर्माण होत आहे. यामुळे त्यांचा कोंडमारा होत आहे. यातून तो व्यसनाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. सध्याचा या कालावधीत महिला ही तणावात आहेत पण योग्य ते समायोजन करत असल्यामुळे त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत तणाव कमी दिसत आहे. पण सध्याच्या परिस्थितीमुळे काहींना शेजारुन ॲम्ब्युलन्स जरी गेली तरी त्यांची झोप उडत आहे अशा तक्रारी मानसोपचार तज्ज्ञांकडे येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कुटुंबाची चिंता

सर नोकरी गेली. आता मी काय करू. हे सर्व कधी संपेल असे प्रश्न तरुणांकडून विचारले जात आहेत. सगळं काही लवकर सुरळीत व्हावे व आपण कामावर जावे यासाठी तरुण सध्या लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. सोबतच आपण कामावर गेल्यानंतर आपल्यामुळे कुटुंबीयांना बाधा तर होणार नाही ना याचा विचारही तरुणांना सतावत आहे. यामुळे याबाबतचे प्रश्न तरुणांकडून विचारले जात आहेत, अशी माहिती डॉ. अतिश बोराडे यांनी दिली.

 

सध्या सर्वांवर तणाव जरी असला तरी तणावाचे समायोजन करणे गरजेचे आहे. सारखे तणावात असल्यामुळे तणाव दुसऱ्या मार्गाने म्हणजेच डोकेदुखी, पोटदुखी किंवा अन्य आजारातून बाहेर पडू शकतो. यामुळे सध्या सकारात्मक बाबींवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबाला वेळ द्या.

- दिलीप बुरटे, मनोविकार तज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालय