शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

५२ हजार गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेला लागले सलग २८ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:10 IST

मंठाळकर खाणीत गणरायाला निरोप : मंगळवारी सकाळी ९ पासून बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते काम

ठळक मुद्देयंदाच्या वर्षी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्र्तींना सोलापूरकरांनी पसंती दिलीजुळे सोलापुरातील अनिल कोकाटे यांनी पाण्यामध्ये मूर्तीच्या वजनाइतका सोडा टाकून विसर्जन केलेयावेळी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन पूजा झाली

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील शेकडो गणेशभक्तांनी यंदा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याचे मंगळवारी दिसून आले. विशेष म्हणजे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजकांनी आपल्या घरातील गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने मंठाळकर खाणीमध्ये सुमारे ५२ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितले.

शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम, त्यांचे पती रमेश यन्नम यांनी मंगळवारी सकाळी आपल्या घरी गणेश विसर्जन केले. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही घरीच विसर्जन केले. मनपाच्या वतीने मूर्ती संकलनासाठी आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून १०९ संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. 

अनेक गणेशभक्तांनी या ठिकाणी गणेशमूर्ती सुपूर्द केल्या. मंठाळकर खाणीमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून मनपा कर्मचारी गणेश विसर्जन करीत होते. महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगर अभियंता संदीप कारंजे आदींनी या ठिकाणी भेट दिली.

पीओपीच्या मूर्तीचेही घरीच विसर्जन..यंदाच्या वर्षी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्र्तींना सोलापूरकरांनी पसंती दिली. त्यामुळे घरीच श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करता आले. पण, असेही अनेक जण होते ज्यांना शाडूची मूर्ती मिळाली नाही, त्यांनी आपल्या पीओपीच्या मूर्तीदेखील घरीच विसर्जित केल्या. जुळे सोलापुरातील अनिल कोकाटे यांनी पाण्यामध्ये मूर्तीच्या वजनाइतका सोडा टाकून विसर्जन केले. यावेळी दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन पूजा झाली. 

पोलिसांचा पहाराप्रशासनाने तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यामुळे धर्मवीर संभाजी तलाव परिसरात पोलीस तैनात करण्यात आले. तीन ठिकाणी तंबू मारून पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. अगदी सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत तलाव परिसरात पोलिसांचा पहारा होता. तलावाच्या बॅकवॉटर परिसरात (सैनिक नगरच्या मागील बाजूस) देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही अपवाद वगळता तिथे मूर्ती विसर्जनासाठी कुणी आले नाही. जे काही लोक आले होते ते परतले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव