शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

Interview ; शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल : संजीव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:17 IST

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त ...

ठळक मुद्दे‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शनशेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण संजय माने (आष्टा, जि़ सांगली) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’त तिसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

सतत २० वर्षे एकरी १०० मे़ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे डॉ़ संजय माने म्हणाले, मी १९८८ पासून ऊस शेती करतोय, पूर्वी लागणीचा १८ ते २० मे़ टन तर खोडवा १० मे़ टनच उत्पादन होत होते़ परंतु ऊस उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान समजून घेऊन विद्यापीठ, विविध संस्थांमधील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

१९९६-९७ साली प्रथम एकरी १०० मे़ टन उसाचे उत्पादन घेतले़ तेव्हापासून मागे कधी वळून पाहिलेच नाही़ प्रत्येकवर्षी १०० टनापेक्षा जास्त असे सलग २० वर्षे उत्पादन घेत आहे़ त्यांच्या भाषणातील एकेक शब्द ऐकताना लोकमत अ‍ॅग्रोत्सवातील उपस्थित शेतकरी आश्चर्यचकित होत होते, पण डॉ़ माने यांनी यात आश्चर्य असे काहीच नाही. तुम्हीही १०० मे टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेऊ शकता हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत शेतकºयांना विविध उदाहरणे देऊन सांगितले़ शेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

उसाची लागवड पद्धत...- जमीन सुपीक करण्यासाठी एकरी ४० गाड्या शेणखत, ३ ते ४ टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी ५ ते १० टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीन गाडावे़ त्यानंतर ४ ते ५ फूट सरी सोडून दीड ते तीन फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी़ एकरात कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० हजार उसाचे प्रमाण असावे़ तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते़ शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे़  शिवाय उसाला थोडंथोडं सारखं सारखं सतत पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी