शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Interview ; शास्त्रोक्त पद्धतीने ऊस शेती केल्यास १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल : संजीव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:17 IST

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त ...

ठळक मुद्दे‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शनशेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज

पंढरपूर : जमिनीची सुपिकता, लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक खतांची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या पंचसूत्रीचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास एकरी १०० टनापेक्षा जास्त अ‍ॅव्हरेज हमखास मिळेल, असा विश्वास कृषिभूषण संजय माने (आष्टा, जि़ सांगली) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सवा’त तिसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एकरी १०० ते १२५ टन ऊस उत्पादन सहज शक्य’ या विषयावर त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

सतत २० वर्षे एकरी १०० मे़ टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे डॉ़ संजय माने म्हणाले, मी १९८८ पासून ऊस शेती करतोय, पूर्वी लागणीचा १८ ते २० मे़ टन तर खोडवा १० मे़ टनच उत्पादन होत होते़ परंतु ऊस उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान समजून घेऊन विद्यापीठ, विविध संस्थांमधील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

१९९६-९७ साली प्रथम एकरी १०० मे़ टन उसाचे उत्पादन घेतले़ तेव्हापासून मागे कधी वळून पाहिलेच नाही़ प्रत्येकवर्षी १०० टनापेक्षा जास्त असे सलग २० वर्षे उत्पादन घेत आहे़ त्यांच्या भाषणातील एकेक शब्द ऐकताना लोकमत अ‍ॅग्रोत्सवातील उपस्थित शेतकरी आश्चर्यचकित होत होते, पण डॉ़ माने यांनी यात आश्चर्य असे काहीच नाही. तुम्हीही १०० मे टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेऊ शकता हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत शेतकºयांना विविध उदाहरणे देऊन सांगितले़ शेतकºयांनी आता मानसिकता बदलून सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

उसाची लागवड पद्धत...- जमीन सुपीक करण्यासाठी एकरी ४० गाड्या शेणखत, ३ ते ४ टन गांडूळ खत, करंजी, एरंडी, लिंबोणी पेंड, लेंडी खत, हिरवळीचे खत, मळी ५ ते १० टन आदीपैकी जे शक्य असेल ते खत जमिनीन गाडावे़ त्यानंतर ४ ते ५ फूट सरी सोडून दीड ते तीन फूट अंतरावर एक डोळा पद्धत लागवड करावी़ एकरात कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ६० हजार उसाचे प्रमाण असावे़ तरच उसाच्या पाल्याला सूर्यप्रकाश मिळू शकते आणि उसाची वाढ होते़ शिवाय फुटवा कमी करण्यासाठी बाळभरणी करणे गरजेचे आहे़  शिवाय उसाला थोडंथोडं सारखं सारखं सतत पाणी देणे गरजेचे असल्याचे संजीव माने यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी