शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

काँग्रेसने गावागावांत विकासाऐवजी गुंडगिरीचे महापाप पोहोचविले : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:56 AM

त्यागी-योगी यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात महत्त्व आहे.

ठळक मुद्देभाजपा कार्यकर्त्यांना धक्का लागल्यास खपवून घेतले जाणार नाही - पालकमंत्री देशमुखचौकीदार चोर नसून ते चोरांना देशाबाहेर काढत आहेत - श्रीकंठ महास्वामी

अक्कलकोट : गेल्या अनेक वर्षांत अक्कलकोट तालुक्यात विकासाऐवजी प्रत्येक गावागावांत गुंडगिरी पोहोचविण्याचे महापाप येथील लोकप्रतिनिधींनी केल्याचा आरोप पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला.

ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. व्यासपीठावर डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, नागणसूर मठाचे श्रीकंठ महास्वामी, मैंदर्गी मठाचे नीलकंठ महास्वामी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अक्कलकोट नगराध्यक्षा शोभा खेडगी, दुधनीचे भीमाशंकर इंगळे, सचिन कल्याणशेट्टी, सुरेखा होळीकट्टी, दत्तात्रय तानवडे, आनंद तानवडे, मंगल कल्याणशेट्टी, अण्णप्पा बाराचारी, प्रभाकर मजगे, तुकाराम बिराजदार, रामप्पा चिवडशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, चंद्र्रकांत इंगळे, यशवंत धोंगडे आदी होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, मूलभूत सुविधा देण्याऐवजी गावागावांत गुंडगिरी पोहोचविण्याचे महापाप करणाºयांना खड्यासारखे बाजूला सारा. भाजपा कार्यकर्त्यांना धक्का लागल्यास खपवून घेतले जाणार नाही.

नागणसूरचे श्रीकंठ महास्वामी म्हणाले, चौकीदार चोर नसून ते चोरांना देशाबाहेर काढत आहेत. त्यागी-योगी यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात महत्त्व आहे. जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही शेवटची निवडणूक सांगत रिंगणात येत आहेत. आता कार्यकर्त्यांनीच सर्जिकल स्ट्राईक करावे. सचिन कल्याणशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. महेश हिंडोळे, सुरेखा होळीकट्टी, आनंद तानवडे, यशवंत धोंगडे आदींचे मनोगत झाले. बाळासाहेब मोरे, आलम कोरबू, महेश पाटील, अप्पू परमशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, चेअरमन, गावकरी उपस्थित होते. संचालन शिवशरण जोजन यांनी तर आभार मोतीराम राठोड यांनी मानले.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक