शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्रेरणादायी प्रवास; भेळगाडीवर उभारला चौघांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:49 IST

अशिक्षित माता-पित्यांनी बनवलं तिघांना प्राध्यापक, कलाशिक्षक अन् लिपीक

ठळक मुद्दे१९७० च्या दशकामध्ये वसंत भाऊराव खिलारे पंढरपूर तालुक्यात चळे येथून रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापुरात आलेअशोक चौक परिसरामध्ये दोन भाड्याच्या खोल्यामध्ये संसार थाटला. आयुष्यात नाही कधी म्हणायचं नाही आणि कोणतंही काम चांगलं-वाईट नसतं ते आपल्या मानण्यावर अवलंबून असतं

विलास जळकोटकर 

सोलापूर: जिद्द आणि चिकाटी जोडीला दुर्दम्य इच्छाशक्तीची जोड असली की अशक्य ते शक्य करण्याची किमया साधते. असंच काहीसं अशिक्षित माता-पित्यांनी चक्क भेळचा गाडा चालवून लेकीचा-लेकांचा सुखी संसार तर उभारलाच शिवाय तिघांना प्राध्यापक, कलाशिक्षक अन् ग्रंथपाल बनवून आयुष्यात अशक्य काहीच नाही असा संदेश वसंत आणि द्वारकाबाई खिलारे दाम्पत्यांनी दिला आहे.

१९७० च्या दशकामध्ये वसंत भाऊराव खिलारे पंढरपूर तालुक्यात चळे येथून रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापुरात आले. अशोक चौक परिसरामध्ये दोन भाड्याच्या खोल्यामध्ये संसार थाटला. पोटासाठी काहीतरी करायचे म्हणून वसंत खिलारे आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी या परिसरात भेळ तयार करुन विकायची त्यातून मिळणाºया पैशातून गुजराण करायची हा त्यांचा नित्यक्रम बनला. द्वारकाबाईच्या हातच्या खमंग भेळची हळूहळू परिसरात चर्चा होऊ लागली. मग चारचाकी गाड्याद्वारे हा व्यवसाय सुरु झाला. हळूहळू जम बसला. राजू, अंबादास, नितीन ही मुलं शाळा शिकत आई-वडिलांना मदत करु लागली. 

कामावरची निष्ठा आणि मुखी गोडवा या बळावरच खिलारे दाम्पत्यांनी आपण शाळेत जाऊ शकलो नाही पण मुलांना अशिक्षित ठेवायचं नाही या भावनेनं त्यांना शाळेपासून वंचित ठेवलं नाही. मोठी मुलगी सुरेखा, त्यानंतर राजू, अंबादास, आणि नितीन यांनी जिद्दीनं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. हा सारा संसाराचा गाडा केवळ एका भेळगाडीवर सुरु होता. मोठ्या मुलीचं लग्न झालं.

दोन नंबरचे राजू सध्या लोकसेवा हायस्कूलमध्ये लिपिक तर आणि चार नंबरचे नितीन खिलारे हे कलाशिक्षक म्हणून एकाच शाळेत सेवा बजावत आहेत. दोन नंबरच्या अंबादास यांनीही प्रगतीचा टप्पा पार करीत प्राध्यापकाची नोकरी मिळवली. ते सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे अध्यापनाचे काम करतात.  भाड्याच्या घरात राहणारे खिलारे दाम्पत्य स्वत:च्या मालकीच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. भेळ गाडीमुळेच हे सारं साध्य झाल्याची जाणीव सर्वांनाच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं. 

भेळ हीच आमची लक्ष्मी ! आयुष्यात नाही कधी म्हणायचं नाही आणि कोणतंही काम चांगलं-वाईट नसतं ते आपल्या मानण्यावर अवलंबून असतं. मन लावून मेहनत करा या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही भावंडं शिकू शकलो. भेळ गाडीमुळं आमचा संसार फुलला. तीच खरी आमची लक्ष्मी आम्ही मानतो. ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व्यवसायानंतर गेल्या आठ वर्षांपासून अथक परिश्रम करणारे आमचे आई-वडील प्रसन्न चित्ताने आयुष्य जगताहेत हीच आमच्या दृष्टीनं समाधानाची बाब असल्याची भावना कलाशिक्षक तथा चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय