शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गर्दी कराल तर खरेदीचा हक्क हिरावून बसाल;‘लक्ष्मण रेषा’ पाळाल तर हसत-खेळत घरी जाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:56 AM

सोलापूरकरांना हवीय शिस्तीची गरज : एकीकडे भाजी मंडईत तुफान गर्दी तर दुसरीकडे किराणा दुकानासमोर रेषा

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवेजीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवेशिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता

सोलापूर : जमावबंदीच्या काळात लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर सर्वांचा खरेदीचा हक्क हिरावला जाण्याची शक्यता आहे. यावर तोडगा म्हणून अनेक भाजी विक्रेत्यांनी आणि दुकानदारांनी दुकानासमोर ‘लक्ष्मण रेषा’आखली आहे. ही रेषा पाळली तर सर्वकाही सुखकर होणार असल्याचा संदेश दिला जातोय. 

केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले; परंतु जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यात केंद्र सरकारकडून अचानक घोषणा होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे. बाहेर पडलेल्या लोकांना पोलीस अडवित आहेत. त्यातच मंगळवारी रात्री लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुकानांसमोर गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी बाजार समिती, लक्ष्मी मार्केट, ७० फूट रोड भाजी मंडई परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी चिंता व्यक्त करु लागले.

यादरम्यान, अकलूज, अक्कलकोट, मंद्रुप आणि सोलापुरातील मंगळवार पेठेसह विविध भागातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी दुकानासमोर तीन-तीन फूट अंतर राखून पांढºया रेषा आखल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी पांढºया चौकोनात थांबून सुरक्षित अंतर राखल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दुकानदार आणि ग्राहकांच्या या भूमिकेचे स्वागत केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. 

या दुकानदारांचा आदर्श घ्या- सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता दिली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये भाजी विक्रेते आणि दुकानदारांनी दुकानासमोर रांगोळी, चुना, स्टीकरच्या सहाय्याने लक्ष्मणरेषा आखल्या आहेत. जिल्ह्यातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

संपर्कात येणे टाळा- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याShoppingखरेदीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस