शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसेल तर,चौकशी करू - राधाकृष्ण विखेपाटील

By संताजी शिंदे | Updated: March 4, 2023 16:53 IST

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार ...

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतं नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल लगेचच कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कांद्याबाबत माहिती दिली.

अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. नाफेडने खरेदी केली किंवा व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीत. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल .स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनुदान संदर्भात सांगितले आहे की सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला मग अनुदान संदर्भात देखील अंतिम निर्णय होईल.असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी कडून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नव्हती. कांदा उत्पादक शेतकरी व विरोधी पक्ष राज्यभरात कांद्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, आंदोलन करत आहेत, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता,त्यांनी उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपया देखील दिला नाही.उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या, एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त देण्याचा निर्णय घेतला.ज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे .१२ हजार कोटी रुपयांची निधी सरकार आल्यापासून मागील सात महिन्यात शेतकऱ्यांना दिलेत

महाविकास आघाडीचा 'एमआयएम'ला पाठिंबा आहे का हे जाहीर करावं - विखे-पाटील

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर नामांतर केले आहे. या बाबतीत इम्तियाज जलील यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधाची आहे. राज्यसरकारने ठराव करून केंद्रपर्यंत पाठपुरावा केला, मोदीजी आणि अमित शाह यांनी संमती दिली. याआधी केवळ वल्गना केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा महाविकास आघाडीच्या काळात सत्कार होत होता. याच एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, मात्र  इम्तियाज जलिलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का?  हे त्यांनी जाहीर केले पाहिजे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapurसोलापूरonionकांदा