शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसेल तर,चौकशी करू - राधाकृष्ण विखेपाटील

By संताजी शिंदे | Updated: March 4, 2023 16:53 IST

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार ...

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतं नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल लगेचच कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कांद्याबाबत माहिती दिली.

अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. नाफेडने खरेदी केली किंवा व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीत. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल .स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनुदान संदर्भात सांगितले आहे की सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला मग अनुदान संदर्भात देखील अंतिम निर्णय होईल.असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी कडून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नव्हती. कांदा उत्पादक शेतकरी व विरोधी पक्ष राज्यभरात कांद्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, आंदोलन करत आहेत, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता,त्यांनी उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपया देखील दिला नाही.उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या, एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त देण्याचा निर्णय घेतला.ज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे .१२ हजार कोटी रुपयांची निधी सरकार आल्यापासून मागील सात महिन्यात शेतकऱ्यांना दिलेत

महाविकास आघाडीचा 'एमआयएम'ला पाठिंबा आहे का हे जाहीर करावं - विखे-पाटील

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर नामांतर केले आहे. या बाबतीत इम्तियाज जलील यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधाची आहे. राज्यसरकारने ठराव करून केंद्रपर्यंत पाठपुरावा केला, मोदीजी आणि अमित शाह यांनी संमती दिली. याआधी केवळ वल्गना केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा महाविकास आघाडीच्या काळात सत्कार होत होता. याच एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, मात्र  इम्तियाज जलिलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का?  हे त्यांनी जाहीर केले पाहिजे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapurसोलापूरonionकांदा