शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसेल तर,चौकशी करू - राधाकृष्ण विखेपाटील

By संताजी शिंदे | Updated: March 4, 2023 16:53 IST

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार ...

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतं नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल लगेचच कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना कांद्याबाबत माहिती दिली.

अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. नाफेडने खरेदी केली किंवा व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीत. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल .स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनुदान संदर्भात सांगितले आहे की सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला मग अनुदान संदर्भात देखील अंतिम निर्णय होईल.असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी कडून शेतकऱ्यांना मदतच मिळाली नव्हती. कांदा उत्पादक शेतकरी व विरोधी पक्ष राज्यभरात कांद्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, आंदोलन करत आहेत, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता,त्यांनी उत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपया देखील दिला नाही.उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या, एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त देण्याचा निर्णय घेतला.ज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे .१२ हजार कोटी रुपयांची निधी सरकार आल्यापासून मागील सात महिन्यात शेतकऱ्यांना दिलेत

महाविकास आघाडीचा 'एमआयएम'ला पाठिंबा आहे का हे जाहीर करावं - विखे-पाटील

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर नामांतर केले आहे. या बाबतीत इम्तियाज जलील यांची भूमिका ही पहिल्यापासून विरोधाची आहे. राज्यसरकारने ठराव करून केंद्रपर्यंत पाठपुरावा केला, मोदीजी आणि अमित शाह यांनी संमती दिली. याआधी केवळ वल्गना केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणाऱ्यांचा महाविकास आघाडीच्या काळात सत्कार होत होता. याच एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, मात्र  इम्तियाज जलिलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का?  हे त्यांनी जाहीर केले पाहिजे.  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapurसोलापूरonionकांदा