Maharashtra News: सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम काका साठे यांची हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईने दुखावलेल्या साठेंनी आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असे ठरवले आहे, अशा स्पष्ट शब्दात आपल्याला भावना वाट मोकळी करून दिली. 'आता परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. विविध पक्षांचे निरोप येत आहेत, मात्र विचारांती कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यात येईल', असे ते म्हणाले.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'कोणत्याही पक्षात गेलो तरी आमदार सुभाष देशमुख यांच्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणायचे आहे', असा शब्द बळीराम काका पाटील यांनी यावेळी दिला.
ज्या पद्धतीने काढले ते विसरता येणार नाही -साठे
'मी राजकारणात विश्वासाने कोणाचा गळा कापला नाही त्यामुळे विश्वासाने राजकारण करणाऱ्यांशी जमवून घेतो. कितीही आव्हाने असताना शरद पवार यांची साथ सोडली नाही मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून हटवताना जी पद्धत अवलंबली ती विसरता येणारी नाही', अशी खंत बळीराम काका साठेंनी व्यक्त केली.
वाचा >>नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
'आता पुन्हा पवारसाहेबांकडे जायचे नाही, असे ठरविले आहे. फक्त कुठे जायचे हा निर्णय घेण्यासाठी थोडं थांबावे लागणार आहे', असे ते कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.
बळीराम काका साठेंना विविध पक्षांचे निरोप
'भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे फोनवर बोलले व निर्णय घेण्यासाठी गडबड करू नका म्हणाले. त्यांची प्रत्यक्षात भेटीत चर्चा होईल', असे साठेंनी संगितले.
आमदार देशमुख यांनीही काकांशी भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याचा पवारसाहेबांचा फोन येईल, असा निरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही काकांशी संपर्क केला आहे.
अजित पवारांकडे जाण्याची सूचना
तालुक्यातील विविध गावचे लोक काकांना भेटत आहेत. काहींनी आहे तिथेच बरे आहे, बऱ्याच लोकांनी अजित पवार गटात जावे असे सुचविले तर काहींनी तुम्ही काही निर्णय घ्या, असे सांगत आहेत.
मी जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे बी फार्म 3 खा. मोहिते-पाटील यांच्याकडे होते. माझ्या मोहोळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा बी फार्म घेण्यासाठी मोहिते-पाटील यांच्याशी वादावादी करावी लागल्याचे काकांनी सांगितले.