शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लूने सोलापुरातील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:30 IST

‘आलं अन् तुळशी’चा दिला जातो काढा; आयसोलेशनमध्ये टीव्हीसोबत पुस्तकांचीही सुविधा

ठळक मुद्देरुग्ण बरा होऊन घरी गेल्यास त्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक द्यायला हवीकोरोना आजारातून बाहेर पडलेला रुग्ण आता सामान्य झालेला असतोइतरांप्रमाणे मास्क वापरायला हवे. तसेच इतरांपासून साडेतीन फूट अंतर राखायला हवे

सोलापूर : कोरोना आजारावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी त्यावर उपचार करणे शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णांना सकस आहार व रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी औषधे देण्यात येतात. यामुळे या आजारावर उपचार करणे शक्य होते.

गंभीर व सौम्य लक्षणे यानुसार रुग्णांमध्ये विभागणी करण्यात येते. ज्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो त्याला आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये अ‍ॅडमिट केले जाते, तर इतर रुग्णांना सामान्य वॉर्डामध्ये (आयसोलेशन वॉर्ड) अ‍ॅडमिट केले जाते. या सामान्य वॉर्डामध्ये आॅक्सिजन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लू ही औषधे दिली जातात. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून विटॅमिन सी, विटॅमिन बी १२ ची औषधे दिली जातात. यासोबत प्रथिनेयुक्त सकस आहार (हायप्रोटिन डायट) यात अंडी, दूध, पोळी-भाजी, वरण, भात, चिक्की यांचा समावेश असतो.

रुग्णांचे मन लागावे म्हणावे टीव्हीची सोय करण्यात आली आहे. आयसीएमआर (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) यांच्या नव्या नियमाप्रमाणे रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून सात ते दहाव्या दिवशी त्याला ताप व इतर लक्षणे नसल्यास त्याला दहाव्या दिवशी घरी सोडले जाते.ज्या रुग्णामध्ये लक्षणे आहेत त्यांचा १४ व्या दिवशी पुन्हा एकदा दोनवेळा स्वॅब घेऊन तो निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जाते. दोनदा स्वॅबची चाचणी केली जाते. यात रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येते.

रुग्णांना मोबाईल वापरण्यास मुभा दिली जाते. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहू शकतात. रुग्णालयात काम करणाºया काही कर्मचाºयांनाही वाईट अनुभव आला. त्यामुळे अशा कर्मचाºयांच्या राहण्याची सोय रुग्णालय व्यवस्थापनाने केली आहे.

..असा असतो रुग्णांचा दिनक्रम- सकाळी आंघोळीनंतर ७:३० वाजता चहा दिला जातो. ८:३० वाजता नाष्टा तर ११ वाजता काढा दिला जातो. एक दिवस तुळशीच्या पानांचा तर एक दिवस आल्याचा असा आलटून-पालटून काढा दिला जातो. दुपारी १२.३० ते एकच्या दरम्यान जेवण दिले जाते. सायंकाळी पाच वाजता चहा व बिस्कीट दिले जातात. रात्री ८ ते ८.३० दरम्यान जेवण दिले जाते. सकाळी नाष्टा तर रात्री जेवणानंतर औषधे दिली जातात. अतिदक्षता विभागात असणाºया (श्वास घेण्यास त्रास असणाºया) रुग्णांना दिवसातून तीन वेळा इंजेक्शन दिले जाते. रुग्ण हे त्याच्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचतात व टीव्ही देखील पाहतात.

रुग्ण बरा होऊन घरी गेल्यास त्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक द्यायला हवी. पुढील सात दिवस त्याने काळजी घ्यावी. कोरोना आजारातून बाहेर पडलेला रुग्ण आता सामान्य झालेला असतो. त्यानेही इतरांप्रमाणे मास्क वापरायला हवे. तसेच इतरांपासून साडेतीन फूट अंतर राखायला हवे.- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस