शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:20 IST

वीरपत्नीची संघर्ष गाथा; पानगावच्या राहीबाई पवार यांचा त्याग; पुतण्यास दत्तक घेऊन चालवले शहीद पतीचे नाव

ठळक मुद्देपाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झालापठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले

प्रसाद पाटीलपानगाव: अंगावरची हळद पुसण्याआधी देशसेवेसाठी पती शहीद झाले. सुखाच्या चार दिवसांची आठवण आयुष्यभर उराशी बाळगत पानगावच्या वीरपत्नी राहीबाई पवार यांनी त्याग केला आहे. शहीद पती अभिमन्यू पवार यांचं नाव चिरकाल टिकून राहण्यासाठी विवाह केला नाही. पुतण्यास दत्तकपुत्र करून घेऊन पतीची आठवण आयुष्यभर टिकवून ठेवली आहे. 

भारतीय कुटुंब संस्था हीच मुळी नारीच्या त्यागावर टिकून आहे आणि त्या त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पानगावच्या वीर पत्नी राहीबाई पवार... १९६५ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेला शिपाई अभिमन्यू भीमराव पवार यांच्या पत्नी राहीबाई... परसदारात सागरगोटे खेळणारी राही... बार्शी तालुक्यातील इर्ले गावच्या कष्टाळू शेतकरी सखाराम काजळे यांची धाकटी कन्या. 

हसण्या-खेळण्याच्या वयातच राहीबाईची थोरली बहीण पानगावच्या सुखदेव पवार या ७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत सैनिकाच्या अर्धांगिनी .. थोरली बहीण रुक्मिणीनं आपल्या धाकट्या दिरासाठी ६ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत शिपाई अभिमन्यू पवार यांच्यासाठी या स्थळाचा अट्टाहास केला आणि राहीबार्इंचा विवाह ठरला... अभिमन्यू वयाच्या १८ व्या वर्षी भावाच्या पावलावर पाऊल ठेवून १९६१ मध्ये देशसेवेत रुजू झाले. विवाह जमला. ३ सप्टेंबर १९६५ ला लग्नाची तारीख ठरली. एक महिन्याच्या सुट्टीवर अभिमन्यू गावाकडे आला. 

लग्नाची धामधूम. पाच दिवसांत हळदी-देवकार्य पार पडलं... लग्नाचा दिवस उजाडला राही बोहल्यावर चढली... शुभमंगल सावधान... पार पडलं... उपवरही न झालेल्या वधूच्या मनाचा अल्लडपणाही कमी झाला नव्हता... लाजणे, लपणे तर सोडाच खेळकरपणाच अद्याप गेला नव्हता... लग्नाच्या पाचव्या दिवशी तार आली.. ताबडतोब निघा... भारत-पाक युद्ध भडकलं होतं... हळदीच्या अंगानंच अभिमन्यू कर्तव्यावर निघाला... चिमुकली राही मात्र चाललेल्या घडामोडींपासून अनभिज्ञ होती.

 तेथे पोहोचताच पुंछ सेक्टरमधील मोर्चावर नियुक्ती झाली. पाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झाला. पठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले. 

भारतीय संस्कृती व कुटुंबव्यवस्थेला साजेसा त्याग करणाºया राहीबाई आपल्या जीवनाचा उत्तरार्ध आपला दत्तकपुत्र पुतण्या प्रकाश पवार याच्या आश्रयाने व्यतीत करत आहेत.

अन् कपाळाचं कुंकू पुसलंइकडे नवºयाच्या परतण्याची वाट बघणाºया पवार कुटुंबाच्या हाती मात्र भारत-पाक युद्धात अभिमन्यू शहीद झाल्याची तार मिळाली. जेवणावळीचा गंध अजून दरवळत होता... सगेसोयºयांची वर्दळ अजून कमी व्हायची होती. जाणत्या माणसांना समजलं... राहीबाई मात्र अनभिज्ञ... हातावरची मेहंदी काळवंडली होती... वºहाडीकºयांच्या बैलगाडीची घुंगरं मुकी झाली होती... अंगाची हळद पुसण्याआधीच कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं.

वीरपत्नी सन्मानाचं जगणंराहीबाईला काहीच समजत नव्हतं.. पण त्या नासमज वयातही राहीने वीरपत्नी म्हणून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. लग्नातील प्रसंग आठवला तरच पतीचा चेहरा आठवतो... आणि याच पुसट आठवणीच्या आधारे जगत, पुनर्विवाह न करता वीरपत्नी म्हणून सन्मानानं जीवन व्यतीत करणाºया राहीबाई आज अनेक व्याधीग्रस्त आहेत.

शहीद पत्नीच्या आठवणीसाठीराहीबार्इंनं केलेल्या त्यागापोटी त्यांना पेन्शनसाठी, अनेक हक्कासाठी झगडावं लागलं. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या... न आठवणाºया आपल्या शहीद पतीचं नाव पुढं सुरू रहावं म्हणून सोलापूर पोलीस दलात कार्यरत आपला पुतण्या प्रकाश पवार याला त्यांनी दत्तक घेतलं.  आणि शहीद अभिमन्यू पवार यांचा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आजच्या युगात राहीबाई पवार यांचा सारखा त्याग करणारी व्यक्ती विरळच म्हणावी लागेल. अवघं आयुष्य त्या त्यागी वृत्तीने जगत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला