शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:20 IST

वीरपत्नीची संघर्ष गाथा; पानगावच्या राहीबाई पवार यांचा त्याग; पुतण्यास दत्तक घेऊन चालवले शहीद पतीचे नाव

ठळक मुद्देपाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झालापठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले

प्रसाद पाटीलपानगाव: अंगावरची हळद पुसण्याआधी देशसेवेसाठी पती शहीद झाले. सुखाच्या चार दिवसांची आठवण आयुष्यभर उराशी बाळगत पानगावच्या वीरपत्नी राहीबाई पवार यांनी त्याग केला आहे. शहीद पती अभिमन्यू पवार यांचं नाव चिरकाल टिकून राहण्यासाठी विवाह केला नाही. पुतण्यास दत्तकपुत्र करून घेऊन पतीची आठवण आयुष्यभर टिकवून ठेवली आहे. 

भारतीय कुटुंब संस्था हीच मुळी नारीच्या त्यागावर टिकून आहे आणि त्या त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पानगावच्या वीर पत्नी राहीबाई पवार... १९६५ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेला शिपाई अभिमन्यू भीमराव पवार यांच्या पत्नी राहीबाई... परसदारात सागरगोटे खेळणारी राही... बार्शी तालुक्यातील इर्ले गावच्या कष्टाळू शेतकरी सखाराम काजळे यांची धाकटी कन्या. 

हसण्या-खेळण्याच्या वयातच राहीबाईची थोरली बहीण पानगावच्या सुखदेव पवार या ७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत सैनिकाच्या अर्धांगिनी .. थोरली बहीण रुक्मिणीनं आपल्या धाकट्या दिरासाठी ६ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत शिपाई अभिमन्यू पवार यांच्यासाठी या स्थळाचा अट्टाहास केला आणि राहीबार्इंचा विवाह ठरला... अभिमन्यू वयाच्या १८ व्या वर्षी भावाच्या पावलावर पाऊल ठेवून १९६१ मध्ये देशसेवेत रुजू झाले. विवाह जमला. ३ सप्टेंबर १९६५ ला लग्नाची तारीख ठरली. एक महिन्याच्या सुट्टीवर अभिमन्यू गावाकडे आला. 

लग्नाची धामधूम. पाच दिवसांत हळदी-देवकार्य पार पडलं... लग्नाचा दिवस उजाडला राही बोहल्यावर चढली... शुभमंगल सावधान... पार पडलं... उपवरही न झालेल्या वधूच्या मनाचा अल्लडपणाही कमी झाला नव्हता... लाजणे, लपणे तर सोडाच खेळकरपणाच अद्याप गेला नव्हता... लग्नाच्या पाचव्या दिवशी तार आली.. ताबडतोब निघा... भारत-पाक युद्ध भडकलं होतं... हळदीच्या अंगानंच अभिमन्यू कर्तव्यावर निघाला... चिमुकली राही मात्र चाललेल्या घडामोडींपासून अनभिज्ञ होती.

 तेथे पोहोचताच पुंछ सेक्टरमधील मोर्चावर नियुक्ती झाली. पाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झाला. पठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले. 

भारतीय संस्कृती व कुटुंबव्यवस्थेला साजेसा त्याग करणाºया राहीबाई आपल्या जीवनाचा उत्तरार्ध आपला दत्तकपुत्र पुतण्या प्रकाश पवार याच्या आश्रयाने व्यतीत करत आहेत.

अन् कपाळाचं कुंकू पुसलंइकडे नवºयाच्या परतण्याची वाट बघणाºया पवार कुटुंबाच्या हाती मात्र भारत-पाक युद्धात अभिमन्यू शहीद झाल्याची तार मिळाली. जेवणावळीचा गंध अजून दरवळत होता... सगेसोयºयांची वर्दळ अजून कमी व्हायची होती. जाणत्या माणसांना समजलं... राहीबाई मात्र अनभिज्ञ... हातावरची मेहंदी काळवंडली होती... वºहाडीकºयांच्या बैलगाडीची घुंगरं मुकी झाली होती... अंगाची हळद पुसण्याआधीच कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं.

वीरपत्नी सन्मानाचं जगणंराहीबाईला काहीच समजत नव्हतं.. पण त्या नासमज वयातही राहीने वीरपत्नी म्हणून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. लग्नातील प्रसंग आठवला तरच पतीचा चेहरा आठवतो... आणि याच पुसट आठवणीच्या आधारे जगत, पुनर्विवाह न करता वीरपत्नी म्हणून सन्मानानं जीवन व्यतीत करणाºया राहीबाई आज अनेक व्याधीग्रस्त आहेत.

शहीद पत्नीच्या आठवणीसाठीराहीबार्इंनं केलेल्या त्यागापोटी त्यांना पेन्शनसाठी, अनेक हक्कासाठी झगडावं लागलं. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या... न आठवणाºया आपल्या शहीद पतीचं नाव पुढं सुरू रहावं म्हणून सोलापूर पोलीस दलात कार्यरत आपला पुतण्या प्रकाश पवार याला त्यांनी दत्तक घेतलं.  आणि शहीद अभिमन्यू पवार यांचा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आजच्या युगात राहीबाई पवार यांचा सारखा त्याग करणारी व्यक्ती विरळच म्हणावी लागेल. अवघं आयुष्य त्या त्यागी वृत्तीने जगत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला