शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पाण्याच्या शोधात शेकडो परप्रांतीय मजूर रस्त्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:42 IST

परप्रांतीय मजुरांची अवस्था ना घरका, ना घाटका; फोन करणाºयांची चौकशी करण्याची मागणी

ठळक मुद्देपरप्रांतीय लोक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्यात एक संवाद गरजेचा अधिकाºयांच्या हाताखालचे व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसतेपरप्रांतीय लोकांना रेल्वे सुरू होणार असल्याचे फोन कोणी केले याची चौकशी

सोलापूर : उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यात जाण्यासाठी बुधवारी रेल्वे येणार असल्याचे फोन परप्रांतीय मजुरांना करण्यात आले. शेकडो मजूर राहते घर सोडून बुधवारी पहाटे सोलापूररेल्वेस्थानकावर हजर झाले, परंतु काही वेळातच पोलिसांनी या मजुरांना हाकलून दिले. दिवसभर अन्न-पाण्याच्या शोधात हे मजूर शहरात फिरत असल्याचे पाहायला मिळाले.

उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील दीपककुमार सरोज आणि त्यांचे १०० हून अधिक सहकारी बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली बसले होते. दीपककुमार म्हणाले, आम्ही पाकणी भागात राहतो. या भागातील कंपन्या, रस्ते कामावर मजूर म्हणून काम करतो. पाकणी परिसरात भाड्याने खोल्या घेऊन राहिलो आहोत. गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयाला अर्ज केला होता. उत्तरप्रदेशला जाण्यासाठी बुधवारी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचे आम्हाला मंगळवारी दुपारी फोनवरून सांगण्यात आले. आमच्यातील सर्वांनाच फोन आले होते. सर्वांना फोन आल्यामुळे आम्ही मंगळवारी रात्रीच घर मालकांना खोलीच्या चाव्या दिल्या. पहाटे चालत रेल्वे स्थानकावर पोहोचलो. स्थानकाबाहेर थांबलेल्या पोलिसांनी आम्हाला हाकूलन दिले. पुन्हा पाकणीला गेलो तर तिथे घर मालकाने चाव्या देण्यास नकार दिला. पुन्हा इकडे येऊ नका म्हणून सांगितले. आता परत सोलापुरात आलोय. 

सरकार, प्रशासन आमचा जीव घेणार आहे का? रेल्वे येणार नव्हती तर आम्हाला फोन का केले?, असा सवालही दीपककुमार आणि त्याच्या सहकाºयांनी उपस्थित केला.

केवळ फोन आल्यामुळेच गोंधळ- शहरातील सात रस्ता, रेल्वेस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक या परिसरात बुधवारी सकाळी शेकडो परप्रांतीय बांधव बसलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम आणि त्यांच्या सहकाºयांनी या परप्रांतीयांची भोजनाची व्यवस्था केली. फोन आल्यामुळेच आम्ही घर सोडून रस्त्यावर आलो, असेही सर्वजण सांगत होते. 

अधिकाºयांनी दाखवले एकमेकांकडे बोट- परप्रांतीय रस्त्यावर आले होते त्यावेळी सर्व प्रमुख अधिकारी शासकीय विश्रामगृहात पालक सचिवांसोबत बैठकांमध्ये व्यस्त होते. दुपारी दोनपर्यंत ही बैठक सुरू होती. या काळात अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे याबाबत संपर्क साधला असता त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांना फोन करण्यास सांगितले, परंतु उपजिल्हाधिकाºयांनी परप्रांतीयांचे फोनच घेतले नसल्याचे दीपककुमार आणि त्यांच्या सहकाºयांकडून सांगण्यात आले. प्रशासनात सावळा गोंधळ दिसून आला.

परप्रांतीय लोक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्यात एक संवाद गरजेचा आहे. तो सध्या बिलकुल बंद आहे. अधिकाºयांच्या हाताखालचे व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसते. परप्रांतीय लोकांना रेल्वे सुरू होणार असल्याचे फोन कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे. मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिकाºयांचे फिरते पथक नियुक्त करण्यात यावे.-हसीब नदाफ, प्रदेश सरचिटणीस, मौलाना आझाद विचार मंच. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे