शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी; सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्यप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 09:16 IST

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी  पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे टिव्ट करून केले काैतुक...!

सोलापूर : ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातून दक्षिण सोलापुरात आलेल्या आणि ऊसतोडीचा पुरेसा अनुभव नसल्यामुळे तेथेच अडकून पडलेल्या ५२ मजुरांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मदतीचा हात दिला. या सर्व मजुरांना विशेष बसने मध्य प्रदेशात परत पाठविण्यात आले. या घटनेची दखल घेऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची ट्विटरच्या माध्यमातून प्रशंसा केली आहे.

मध्य प्रदेशातील कटनी येथून सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावरून रोजगारासाठी ५२ मजूर व त्यांचे कुटुंबीय ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मुकादम सुनील मोटे यांनी अनामत रकमा घेऊन ऊसतोडीचे काम सुरू असताना या मजुरांना कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे ऊसतोड करणे जमत नव्हते. काम करता येत नसल्यामुळे मजुरीची रक्कमही मिळणे बंद झाले होते.

मजुरीची रक्कम मिळत नसल्याने उपासमार होऊ लागली. त्यामुळे वैतागलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशात परत पाठविण्याचा आग्रह धरत होते. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मुकादमानेही या सर्व मजुरांना डांबून ठेवले होते.

दरम्यान, आपली अडचण संबंधित मजुरांनी मध्य प्रदेशातील कटनीच्या जिल्हाधिका-यांना कळविली. त्याची लगेचच दखल घेत कटनीच्या जिल्हाधिका-यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते यांनीही यासंदर्भात तेवढीच संवेदनशीलता दाखवत कंदलगाव येथे अडकलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची व्यवस्था केली.

विशेष बसमधून सर्व मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर पाठविण्यात आले. त्यासाठी मुकादम तथा टोळी प्रमुख व ऊसतोड मजुरांमध्ये समन्वय घडवून प्रत्येक मजुराला दोन हजार रूपये मजुरीची रक्कम उपलब्ध केली गेली. शिवाय प्रवासात जेवण, सोलापुरी चादर, टॉवेल तसेच सॕनिटायझर व मुखपट्ट्या पुरविण्यात आल्या. मध्य प्रदेशाच्या सीमेवर तेथील प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी पार पाडली.

तक्रार नसल्याने कारवाई नाहीमध्य प्रदेशातून सुमारे नऊशे किलोमीटर दूर अंतरावरून केवळ रोजगारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेल्या मजुरांना ऊसतोडीच्या कामाचा अनुभव नव्हता. त्यातून त्यांच्या अडचणी वाढल्या. गावी परत जाण्याची त्यांची मागणी होती. परंतु त्यांना तसेच डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता विचारपूस करूनही संबंधित मजुरांनी कोणतीही तक्रार केली नाही. मूळ गावी परत जाणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे होते. तक्रारीअभावी पोलिसांना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता आली नाही.-तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसMadhya Pradeshमध्य प्रदेश