शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ? अशोक चव्हाण यांचा भाजप सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 11:40 IST

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी सरकारला दिले़ आ़ भालके यांच्या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या खा़ ...

ठळक मुद्देसत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार - खा़ अशोक चव्हाणदोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेत - खा़ अशोक चव्हाण निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ - खा़ अशोक चव्हाण

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते़ गेल्या ४ वर्षांत मोदी यांच्या सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी सरकारला दिले़ 

आ़ भालके यांच्या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या खा़ अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कार्यशैलीवर चौफे र टीका केली़ यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, मनपा पक्षनेते चेतन नरोटे आदींची उपस्थिती होती़ 

दिल्ली येथील क ाँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतीमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याची माहिती खा़ अशोक चव्हाण यांनी दिली़ याच मुद्यावर बोलताना खा़ चव्हाण म्हणाले, निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़ दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे़ ४ वर्षांत ८ कोटी तरुणांना रोजगार मिळायला                  हवा होता़ तो मिळालाय का, असा सवाल करीत या सरकारने तरुणांची घोर फसवणूक केल्याचा आरोप केला़

 सत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार तोडफोडीचे राजकारण करीत आहे़ पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिल्याचा उल्लेख टाळत खा़ चव्हाण म्हणाले, भाजपा नेत्यांना त्यांच्याच पक्षातील दिवंगतांबद्दल आस्था नाही़ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्व़ वनगा ऐवजी सावरा असा उल्लेख करतात़ जिवंत आणि मृत व्यक्तीबाबत तारतम्याने बोलायचे असते हे त्यांना माहिती नाही, असा टोला लगावला़ 

या पत्रकार परिषदेला हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, अ‍ॅड़ अर्जुन पाटील (ब्रह्मपुरीकर), केशव इंगळे, सातलिंग शटगार आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा