शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:54 IST

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव...

ठळक मुद्देपालकमंत्री जितेंद्र आव्हाड सोलापूर जिल्हा दौऱ्यावरकोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा घेतला आढावाआरोग्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना

पंढरपूर : सध्या महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या कोरोना विषाणूचा नायनाट करण्याची ताकद फक्त विठ्ठला तुझ्याकडेच आहे. तुला तुझी लेकरे उपाशीपोटी झोपलेली कसे बघवत आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढ असे साकडे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठलाकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलाचे कळस दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन व संत चोखा महाराज यांच्या समाधीला नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी तडफडतोय, शेतमजुरांना काम नाही. रोजंदारीवर जाणारा कामगार अन्ना विना उपाशी झोपतोय. अनेक लोक बेघर झाले आहेत, त्यांना उपाशी झोपण्याशिवाय पर्याय उरला नाही. महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून बाहेर काढ. असे साकडेमहाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने घालण्यासाठी मी  पंढरपुरात आलो आहे. परंतु विठ्ठलाचे मंदिर बंद असल्याने विठ्ठलाचा परमभक्त संत चोखा महाराज यांना नतमस्तक होऊन माझे साकडे विठ्ठलापर्यंत पोहोचव अशी विनवणी केली असल्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस