शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात व्हावे, के. पी. विश्वनाथा यांचा आवाहन, कृषी संशोधन केंद्रातर्फे रंगभवन येथे राष्टÑीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:29 IST

भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही.

ठळक मुद्देकृषी विषयाबद्दल शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या नियतकालिक, पुस्तके आणि घडीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन प्रगतिशील शेतकºयांचे संशोधनाचे प्रसारण व्हायला पाहिजे : कुलगुरु विश्वनाथायुवकांनी कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे : आमदार प्रणिती शिंदे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही; मात्र शेतकºयांच्या मालास बाजारभाव मिळत नाही, ही खंत वाटते. आपण शेतकºयांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. महाराष्टÑात हिवरे बाजार मॉडेल प्रत्येक खेड्यात तयार झाले पाहिजे, अशी अपेक्षा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु के. पी. विश्वनाथा यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर, दयानंद महाविद्यालय व कॉन्टेपररी रिसर्च इन इंडिया नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्टÑीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रणिती शिंदे, व्यासपीठावर म. फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, संशोधक संचालक डॉ. आर. एस. गडाख, इंडियन पोटॅश इन्स्टिट्यूटचे एस. के. बन्सल, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, कृषी महाविद्यालय पुणेचे प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. गजानन खोत (कोल्हापूर), आनंद कोठाडिया, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, जिल्हा अधीक्षक बसवराज बिराजदार यांची उपस्थिती होती.चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी कृषी विषयाबद्दल शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या नियतकालिक, पुस्तके आणि घडीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कुलगुरु विश्वनाथा यांनी आपल्या भाषणातून कृषी पदवीधरांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन करताना प्रगतिशील शेतकºयांचे संशोधनाचे प्रसारण व्हायला पाहिजे. युवकांनी कृषी क्षेत्राकडे वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक करताना ही कृषी पदवीधारकांची पंढरी असल्याचे गौरवोद्गार काढले. डॉ. फरांदे यांनी राष्टÑीय परिसंवाद घेऊन अमृतमहोत्सवाची चांगली सुरुवात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सोलापूरच्या संशोधन केंद्राचे कोरडवाहू तंत्रज्ञान भारतभर प्रसिद्ध असून त्याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन केले. एस. के. बन्सल यांनी दिल्लीच्या इंडियन पोटॅश इन्स्टिट्यूटचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी गेल्या ३० वर्षांपासून संबंध असून, पालाश संशोधन करण्यास सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे आमदार प्रणिती शिंदे यांनी युवकांनी कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे, असे आवाहन केले. महापालिकेची पडीक एक एकर जमीन घेऊन युवकांनी त्यामध्ये कोथिंबीर, मेथी, मुळा, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेऊन रोजगार निर्मिती केली आहे. यातून त्यांना ९०० ते १००० रुपये मिळतात. अशा प्रकारे आदर्श मॉडेल सोलापूर शहरातील पडीक जमिनीत राबवणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. डी. जाधव यांनी तर आभार अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मानले. या चर्चासत्रास देशभरातून शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी, समन्वयक, प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.--------------------पंचसूत्रीद्वारे ज्वारीचे ४० टक्के उत्पादन वाढते - डॉ. शरद गडाख यांनी आपल्या भाषणातून विद्यापीठाने २५७ विविध पिकांच्या जाती, ३४ नवीन अवजारे आणि १४३१ शिफारशी दिलेल्या असून, कृषी संशोधन केंद्र सोलापूर येथे विद्यापीठात सर्वात जास्त काम झाले आहे. त्यात १२ नवीन वाण, २०० विविध तंत्रज्ञान शिफारशी, दिलेल्या आहेत. म. फुले कृषी विद्यापीठाने होप प्रकल्प अंतर्गत दक्षिण सोलापूरमधील पाच गावांमध्ये ज्वारी प्रात्यक्षिकांमध्ये पंचसूत्राचा वापर करून ४० टक्के उत्पादन वाढ होते, असे दाखवून दिल्याचे सांगितले.------------------तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन वाढवाशेतकºयांनी आपले उत्पादन दामदुप्पट करण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला हवे. संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमामध्ये सन २०१७ ते २०२२ पर्यंत शेतकºयांनी एकात्मिक शेती पद्धत, सेंद्रिय शेती, सूक्ष्म सिंचनातून फर्टिगेशन तंत्रज्ञान, बियाणे तंत्रज्ञान, शीतगृह व धान्यकोठार याचा वापर कन  उत्पादन वाढवू शकतो, असा सल्ला कुलगुरु के. पी. विश्वनाथा यांनी शेतकºयांना दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदे