पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 08:29 AM2020-04-29T08:29:40+5:302020-04-29T08:30:36+5:30

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान

Hit Pygmy collection of credit unions; Savings of Rs 40 crore stopped | पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

googlenewsNext
ठळक मुद्देकलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : कोरोना व्हायरसने देशभर आपली पाळेमुळे पसरली आहेत.  त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली़ सर्वच क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला़ असाच एक उद्योग असलेल्या ४० बँका, पतसंस्था, फायनान्स व मल्टीस्टेट यांची पिग्मी (दैनंदिन ठेव) गोळा करणाºया शहर व तालुक्यातील सुमारे ३०० एजंटांना फटका बसला आहे़ या काळात सुमारे चाळीस कोटी रुपये कलेक्शन बुडाले आहे़ 

बार्शी शहर हे सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी केवळ शहर व तालुकाच नव्हे तर निम्मा उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगरचा काही भाग आदी ठिकाणाहून किराणा व इतर माल खरेदीसाठी नागरिक व छोटे-मोठे व्यापारी येतात़ त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते़ बार्शी शहरात १३ पतसंस्था, १५ सहकारी बँका, तीन मल्टीस्टेट सोसायटी, ४ निधी फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा चाळीस पेक्षा जास्त संस्था आहेत़ या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगरकर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे तीनशे एजंटाच्या माध्यमातून कलेक्शन केले जाते.

 कित्येक छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणून देखील रोज शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते़ तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे़ ते या पिग्मीच्या माध्यमातून बँकांकडे भरत असतात़ कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रावर संकट ओढावले आहे. सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर  हे संकट दूर व्हावे यासाठी गावोगावी प्रार्थना होऊ लागली आहे.

दैनंदिन रोजीरोटीवर परिणाम
- सध्या जनता कर्फ्यूपासून हॉस्पिटल, मेडिकल, किराणा व भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ त्यामुळे या हातावरचे पोट असणाºया म्हणजे कलेक्शन केले तरच चार पैसे मिळणारा व एजंट वर्ग अडचणीत आला आहे़ कित्येक एजंटाचे एका दिवसाचे कलेक्शन पाच हजारांपासून वीस ते पन्नास हजारांपर्यंत आहे़ त्यांना काही संस्था दीड टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत कमिशन देतात़ हे कलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली आहे़ त्यामुळे संस्थांचा एनपीए ही वाढण्याचा धोका आहे़ 

सर्व पतसंस्था, बँका, मल्टीस्टेट, फायनान्स यांचे मिळून शहर व तालुक्यात दररोज सव्वा कोटी रुपयापेक्षा जास्त संकलन होत होते; मात्र गेल्या पस्तीस दिवसांपासून बंद असल्यामुळे तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली आहे़ यामुळे संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़ 
- मिलिंद कांबळे, सरव्यवस्थापक, भगवंत मल्टीस्टेट बार्शी.

Web Title: Hit Pygmy collection of credit unions; Savings of Rs 40 crore stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.