शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 5:06 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष : विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्याची भाविकांची मागणी

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाच्या अभ्यासकांनीही या विहिरीला भेट देऊन पाहणी केली ऐतिहासिक बाजीराव विहिरीच्या कठड्याचे कोरीव दगड गायब प्रशासनाने विहीर व परिसराची स्वच्छता करणे गरजेचे

प्रभू पुजारी/रामदास नागटिळक । 

पंढरपूर : ऐतिहासिक बाजीराव विहीऱ़़ या विहिरीचे कोरीव व रेखीव दगड चक्क चोरीला गेलेले़़़ विहिरीत अन् पायºयांवर कचरा साचलेला़़़ प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पालापाचोळा पडलेला़़़ केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे या बाजीराव विहिरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते़ 

पंढरपूरपासून पुणे मार्गावर केवळ १० किलोमीटर अंतरावर ही ऐतिहासिक बाजीराव विहीर आहे़ पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधली आहे. या ठिकाणी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली व श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील अखेरचे उभे व गोल रिंगण या ठिकाणी होत असल्याने या स्थळाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

या रिंगण सोहळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने वारकरी या बाजीराव विहीर परिसरात विश्रांती घेतात़ शिवाय पंढरीकडे जाणारा पालखी सोहळ्यातील प्रत्येक भाविक ही ऐतिहासिक विहीर नक्की पाहतोच़ याशिवाय महाराष्ट्रातील अनेक इतिहासतज्ज्ञ व पुरातत्त्व विभागाच्या अभ्यासकांनीही या विहिरीला भेट देऊन पाहणी केली आहे़ पंढरपूर-पुणे मार्गावर ही विहीर असल्यामुळे अनेक पर्यटक या मार्गावरून जाताना वाहने थांबवून ही ऐतिहासिक बाजीराव विहीर नक्कीच पाहतात़ परंतु अशा या ऐतिहासिक बाजीराव विहिरीच्या कठड्याचे कोरीव दगड गायब झाले आहेत़ शिवाय या विहिरीच्या पायºयांवर आणि पाण्यात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पालापाचोळा पडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे़ त्यामुळे प्रशासनाने विहीर व परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे़

प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या व विसावा ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो़ परंतु पालखीमार्गावरील या ऐतिहासिक विहिरीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते़ त्यामुळे प्रशासनाने चोरीला गेलेल्या दगडांच्या ठिकाणी दुसरे दगड बसवून पूर्वीप्रमाणे कठडा तयार करावा आणि विहिरीवर संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी आषाढी सोहळ्यासाठी पंढरीकडे येणाºया अरुण पठारे, सुनील पांढरे, अरविंद राजगुरू आदी भाविकांनी केली आहे़ 

ऐतिहासिक बाजीराव विहिरीचा स्वतंत्र १३४ असा गट नंबर ७/१२ चा उतारा आहे. मात्र या उताºयावर एका शेतकºयाचे नाव होते़ या नावाचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी खोटी कागदपत्रे बनवित ही जागा विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भंडीशेगाव ग्रामपंचायतीने ठराव करीत ही जागा शासनाच्या नावे करण्याची मागणी केली़ त्यानंतर त्यात बदल करून महसूल प्रशासनाने या विहिरीच्या ७/१२ उताºयावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली आहे. त्यामुळे शासनानेच या विहिरीची देखभाल, दुरुस्ती करणे गरजेचे आहे़

भाविकांच्या जीवाला धोका- २२ जुलै रोजी याच बाजीराव विहिरीच्या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण होणार आहे़ या पालखी सोहळ्याबरोबर असलेले लाखो वारकरी या विहीर परिसरात विश्रांत घेतात़ शिवाय ही विहीर पाहण्याचा मोह अनेक भाविकांना आवरत नाही़ या विहिरीवर संरक्षक जाळी नसल्याने तोल जाऊन भाविकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे़ 

या विहिरीजवळ ऐतिहासिक बाजीराव विहिरीची संपूर्ण माहिती लिहून फलक लावावा़ विहीर परिसरात वृक्षारोपण करून कायमस्वरूपी सौरदिव्याची सोय करावी़ चोरून नेलेल्या दगडांच्या ठिकाणी पुन्हा कोरीव दगड बसवून संपूर्ण विहिरीवर संरक्षक जाळी लावावी़- बापूसाहेब पठारे,वारकरी, माजी आ़ वडगाव (पुणे) 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी