शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:08 IST

नोंदणीकृत ११ पैकी पाच जिल्ह्यांतील निर्यात

- अरुण बारसकरसोलापूर :  जून महिन्यापासून पावसाची संततधार व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील द्राक्षाच्या गुणवत्तेला बसला आहे. अनेक बागांना द्राक्षे लागली नाहीत, तर आलेल्या द्राक्षांची म्हणावी तशी गुणवत्ता नसल्याने निर्यातीसाठी नोंदणी झालेल्या ११ पैकी केवळ पाच जिल्ह्यांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे.यावर्षी ११ जिल्ह्यांतील ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना, बुलडाणा व बीड या जिल्ह्यांतील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. पण, प्रत्यक्ष निर्यात केवळ पाच जिल्ह्यांतून होत आहे.नोंदणी अन्‌ निर्यात...आतापर्यंत ९०४ कंटेनरमधून १० हजार ४१६ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली आहे. निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातून ३७ हजार ५८७, सातारा ४९८, सांगली ४ हजार २०४, पुणे १,३६५, अहमदनगर ६०३, सोलापूर ५००, उस्मानाबाद ४००, लातूर १०९, जालना २०, बुलडाणा ९६ आणि बीड जिल्ह्यातील एक, अशा ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. मात्र, केवळ नाशिक १० हजार १६४ टन, सातारा ११२, सांगली १११, पुणे २५, अहमदनगर ४ मेट्रिक टन या पाच जिल्ह्यांतून द्राक्षांची निर्यात झाली आहे.२,३५० टनांची घटमागील वर्षी आतापर्यंत १२ हजार ७६६ मेट्रिक टन द्राक्षांची विविध देशांत निर्यात झाली होती. यावर्षी आतापर्यंत १० हजार ४१६ मेट्रिक टन म्हणजे मागील वर्षीपेक्षा २ हजार ३५० टन निर्यात कमी झाली आहे.