शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; गावागावात शिरले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:32 IST

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे, तलाव, नाल्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव पुलावरून पाणी जोरात वाहू लागले आहे. बोरगांव-घोळसगांव चा संपर्क तुटला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी पालापुर पुल पाण्याखाली गेला आहे. कुरनूर धरणातून सद्यस्थितीमध्ये ६०० क्युसेकने प्रवाह सोडण्यात आलेला आहे.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. शिवाय सोलापुरात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस पडला होता. तेव्हाही अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तहसिल प्रशासनाने नुकसानग्रस्त भाग व कुरनूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागणसूर येथे चार ओढे आहेत. मुसळधार पावसात नागणसूर येथील चारही ओढे फुल भरून वाहू लागले. चारही ओढ्यांवरील पुलावरून पाणी वाहत राहिले. यापैकी भासगी ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आणि नागणसूरचा संपर्क तुटला. सात तास गावचा संपर्क तुटला होता.नागणसूर पुलाकडेचा भराव वाहून

अक्कलकोट-नागणसूर राष्ट्रीय महामार्गावर भासगी ओढ्याच्या पुलावर दिवसभर पाणी राहिल्याने भराव वाहवून गेला. त्यामुळे या पुलावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडून दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. येथे धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असून, याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. पाणी ओसरताच लवकरात लवकर पुन्हा भराव टाकून रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्या. कर्नाटकमध्ये धावणारी वाहने ठप्प

मार्गावरून अक्कलकोटहून धावणारी बरीच वाहने ही कर्नाटक राज्यात जातात. तीर्थक्षेत्र हैद्रा येथे ख्वाजा दर्गा असून, येथे अमावास्या, पौर्णिमा आणि विविध सण, उत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी याच पुलावरील रस्त्यावरून वर्दळ असते. तोळनूर, अक्कलकोट स्टेशन, कर्नाटकातील माशाळ, करजगी, अफझलपूर, उडचण, मनूर, शिंदगी, विजापूर अशा अनेक गावांना हा रस्ता जोडतो. येथून वाहतूक ठप्प झाली आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून, रात्रीच्या वेळी एखादा वाहनस्वार, पादचारी या खड्ड्यात पडून दुर्घटना घडू शकते.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोट