शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

टँकरमधून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी झटतेय आरोग्य खात्याची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:42 IST

पाणी शुद्धीकरणासाठी विशेष पथक : पाण्याचा कलर पिवळा दिसला तरच मिळतो हिरवा कंदील

ठळक मुद्देटंचाई परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील तहानलेल्या गावांना सोलापुरातून टँकरने पाणीपुरवठागुरुद्वार येथे असणाºया दोन खासगी बोअरवेलमधून रोज सुमारे ५० ते ६० टँकर पाणी तहानलेल्या गावांना येथून जात आहेटँकरमधून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी जाणारे हे पाणी शुद्ध आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याची विशेष टीम

संतोष आचलारे

सोलापूर : टंचाई परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील तहानलेल्या गावांना सोलापुरातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गुरुद्वार येथे असणाºया दोन खासगी बोअरवेलमधून रोज सुमारे ५० ते ६० टँकर पाणी तहानलेल्या गावांना येथून जात आहे. टँकरमधून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी जाणारे हे पाणी शुद्ध आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. यावेळी पाणी तपासणीदरम्यान पाण्याचा कलर पिवळा दिसला तरच टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात येत आहे.

टँकरने पाणीपुरवठा करणाºया गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार टँकरमध्ये पाणी भरण्याच्या ठिकाणी पाण्याची शुद्धता तपासण्यात येत आहे. क्लोरोस्कोप या प्रायोगिक उपकरणातून पाण्याचे शुद्धीकरण तपासण्यात येते. टँकरमधून या उपकरणात पाणी घेण्यात येते, त्यात या पाण्याचा रंग पिवळा दिसला तरच पाणी शुद्ध आहे, असा शास्त्रीय निष्कर्ष काढण्यात येतो. पिवळा रंग दिसून आलेल्या टँकरमधील पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येतात. 

गुरुद्वार येथे भरण्यात येणाºया टँकरमध्ये अर्धे पाणी भरल्यानंतर त्यात आरोग्य खात्याच्या टीमकडून मेडिक्लोअर मिसळण्यात येते. टँकर पूर्ण भरल्यानंतर ते संपूर्ण पाण्यात मिसळते. टँकर भरल्यानंतर पुन्हा एकदा टँकरमधील पाणी क्लोरोस्कोपने तपासण्यात येते. जर या उपकरणात पाण्याचा रंग मूळ दाखविला तर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो. असे पाणी शुद्ध केल्यानंतरच ते पुढे पाठविण्यात येते.

दक्षिण सोलापूर तालुक्यात या ठिकाणाहून रोज ४० ते ४२ टँकर भरून जात आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांसाठी रोज २० ते २५ टँकर या ठिकाणावरून भरून जात आहेत. जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डी. व्ही. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरोग्य खात्याची टीम पाणी तपासणीसाठी तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विस्तार अधिकारी बी. के. चव्हाण, आरोग्य सहायक ए. एस. बिराजदार, सी. एस. धत्तरगी आदी कर्मचारी शुद्ध पाण्याची खात्री या ठिकाणी करीत आहेत. 

२४ तास पाण्याची शुद्धता तपासणीगुरुद्वार येथील खासगी बोअरवेलमधून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी जात आहे. हे पाणी पिण्यास योग्य असावे, यासाठी याठिकाणी आरोग्य खात्याची टीम २४ तास तैनात ठेवण्यात आली आहे. रात्री-बेरात्रीही टँकर भरताना पाणी शुद्ध करूनच ते पुढे गावात पाठविण्याचे काम या ठिकाणी होत आहे. यासाठी दोन सत्रात टीम तैनात करण्यात आली आहे. 

एकदा शुद्ध केलेले पाणी आठ तास शुद्ध राहते- बोअरचे पाणी टँकरमध्ये भरल्यानंतर ते पाणी पिण्यास योग्य ठरावे, यासाठी आरोग्य खात्याकडून १२ हजार लिटर पाण्याच्या टँकरमध्ये तीन बाटली मेडिक्लोअर मिसळण्यात येते. त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य ठरते. या पाण्याची शुद्धता किमान आठ तासांपर्यंत टिकून राहते, अशी माहिती यावेळी आरोग्य खात्यातील टीमने दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई