शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रत्नागिरी, देवगडचा हापूस आला सोलापुरात

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 9, 2023 19:28 IST

हैदराबादी बदाम लवकरच आंबेप्रेमींच्या घरात, स्थानिक फळं कमी; बाजारात पाणीदार फळांना मागणी

काशिनाथ वाघमारे, साेलापूर : नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात स्थानिक फळांचं प्रमाण घटलं असून परप्रांतातल्या फळांची आयात वाढली आहे. तसेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबासोलापूरच्या फळ बाजारात दाखल झाला आहे. तसेच हैदराबादचा बदाम आंबाही दाखल झाला असून सर्वसामान्य त्याची खरेदी करताहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणीदार फळांना मागणी आहे. कडक उन्हात शरिरातील पाणी कमी होते. अशावेळी लिंबू शरबत अन ताकासह पाणीदार फळांकडे सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र यंदा स्थानिक पातळीवरची फळं बाजार पेठेत कमी झाली असून परराज्यातून आयात होत आहेत. याशिवाय रत्नागिरी आणि देवगड येथून हापूस तर हैदराबादहून बदाम आंबा दाखल झाला आहे.

ढेरी कमी करणारी 'वॉटर अॅपल'..

यंदा सोलापुरात प्रथमच 'वॉटर अॅपल' हे नवीन फळप्रकार लक्ष्मी मार्केटमध्ये सोलापूरकरांना पाहायला मिळत आहे. बोराच्या चवीप्रमाणे असणारे हे फळ २४० रुपये दराने विकले जात आहे. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवतं अन टिकवते. मागील आठ दिवसापूर्वी काश्मीरमधून हे फळ दाखल झालं असून ते मिठासोबतही खातात. या फळातील गुणधर्मामुळे वाढलेली ढेरी कमी होऊ शकत असल्याचे वैशिष्ट्य फळ विक्रेत्यांनी सांगितले.यंदा नागपूसह ऑस्ट्रेलियनमधून संत्रा विक्रीला आला आहे. स्थानिक फळांचं प्रमाण कमी झालं आहे. आफ्रीकेतून पेर विक्रीला आला आहे. - शोएब बागवान, फळ विक्रेते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SolapurसोलापूरMangoआंबा