शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कॉन्फरन्स अर्ध्यावरच; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलण्याआधीच तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:22 IST

ग्रामीणमधील मृत्यूदराबाबत विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली चिंता; कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा

ठळक मुद्देपुणे विभागातील स्थिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांडलीठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतलाग्रामीणमध्ये वाढत चाललेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची कोरोना आढाव्याची बैठक अर्धवट राहिली. मात्र विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ग्रामीणमध्ये वाढत चाललेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, झेहपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अधीक्षक मनोज पाटील, शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. जयस्वाल आदी उपस्थित होते. 

पुणे विभागातील स्थिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांडली. विभागात ग्रामीणमध्ये कोरोनाचा मृत्यूदर वाढत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ज्येष्ठ व्यक्ती व चिंताजनक रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याची त्यांनी सूचना केली. याबाबत जिल्हाधिकाºयांनी अहवाल मांडण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची चर्चा अर्धवट राहिल्याचे सांगण्यात आले. 

खासगी जागेची पाहणीया आढाव्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकाºयांबरोबर ग्रामीणमधील मृत्यूदर कमी करण्याबाबत चर्चा केली. सिव्हिल हॉस्पिटलकडे अन्य जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत. त्याचबरोबर ग्रामीणमधील अनेक खासगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन उपचाराची सोय करता येईल, असे सुचविण्यात आले. पोटफाडी चौकातील खासगी मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथेही ग्रामीण रुग्णांसाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करता येईल काय, याबाबत जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. 

मृत्यूदर कमी करा: टोपेकोरोनामुळे होणाºया  मृत्यूचा राज्याचा दर ३.३५ टक्के आहे. पण मुंबई, नंदूरबार, सोलापूर,  अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा वाढला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस