शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुरूजीही शेतीत रमले अन् ११ एकरात ७२ लाखांचे उत्पन्न मिळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 11:36 IST

होळे येथील अंकुश चोपडे यांची यशोगाथा; नोकरी करीत असतानाही सुटीच्या दिवशी शेताकडे लक्ष दिले

ठळक मुद्देअंकुश चोपडे हे अरण येथील श्री संत सावता माळी विद्यालयात शिक्षक आहेतहोळे येथे वडिलोपार्जित शेती आहे़ त्यांच्या मातोश्री लक्ष्मी चोपडे यांना शेतीमध्ये काबाडकष्ट करण्याची सवय होतीयोग्य नियोजन केल्यामुळे २१ दिवसांनी निरोगी फूलकळी आली़ त्यानंतर ६० दिवसांत पूर्ण फळधारणा झाली़

मोडनिंब : शिक्षकाची नोकरी असूनही केवळ आई-वडिलांनी आपल्याला कष्ट करायला शिकवले व केलेले कष्ट वाया न जात नाही, असा सल्ला दिला होता़ त्यांचा सल्ला प्रमाण मानून नोकरी करीत असतानाही सुटीच्या दिवशी शेताकडे लक्ष दिले़ त्यामुळेच ११ एकरात डाळिंबातून तब्बल ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही यशोगाथा आहे होळे (ता. माढा) येथील माध्यमिक शिक्षक अंकुश चोपडे यांची.

अंकुश चोपडे हे अरण येथील श्री संत सावता माळी विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांची होळे येथे वडिलोपार्जित शेती आहे़ त्यांच्या मातोश्री लक्ष्मी चोपडे यांना शेतीमध्ये काबाडकष्ट करण्याची सवय होती, त्यांना आपला मुलगा शिक्षक असला तरी त्याने केवळ नोकरीवर अवलंबून न राहता शेतीही चांगल्या पद्धतीने पिकवावी व शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीमध्येही आपण प्रगती करू शकतो हे दाखवून द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे अंकुश चोपडे सुटीदिवशी व शाळेच्या वेळेशिवाय आईबरोबर शेतात कष्ट करायचे़ पाच वर्षांपूर्वी माळरानावर डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला. मात्र जमीन खडकाळ होती़ त्यावर पीक कसे येणार? याचा प्रश्न पडला़ तेव्हा त्यांनी त्या जमिनीत अन्य ठिकाणाहून काळी माती आणून मिसळली़ त्यानंतर जमीन नांगरून भुसभुशीत केली़ विहीर व बोअरला पुरेसे पाणी असतानाही ठिबक सिंचन करून १३ बाय ७ या अंतराने डाळिंबाची रोपे लावली.

तत्पूर्वी त्यामध्ये ३० ट्रेलर शेणखत टाकले़ दुसºया वर्षी झाडाची छाटणी करून प्रत्येक झाडाच्या बुडाला पेस्ट लावून जूनचा बहार धरला.  त्यावेळी अंतर्गत मशागत करून शेणखत व गांडूळ खत मिसळले़ झाडांची पानगळ करण्यासाठी फवारणी केली़ पाणी व खते यांचे योग्य नियोजन केल्यामुळे २१ दिवसांनी निरोगी फूलकळी आली़ त्यानंतर ६० दिवसांत पूर्ण फळधारणा झाली़ पहिल्या वर्षी चांगले उत्पन्न निघाल्यामुळे झालेला १५ लाख रुपये खर्च एकाच वर्षात निघाला़ त्यामुळे आम्हा पती-पत्नीला शेतामध्ये आणखी कष्ट करण्याची ऊर्जा मिळाली़ मजुरांना हाताशी घेऊन आम्ही आमची डाळिंबाची शेती चांगल्या पद्धतीने फुलवण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला दोन वर्षे व्यापाºयांनी जागेवरच डाळिंब खरेदी केली. मात्र नंतर सलग तीन वर्षे युरोप, बांगलादेश या देशांमध्ये डाळिंब एक्स्पोर्ट केले़ सध्या भोर्इंजे (ता़ माढा) येथे मार्केट सुरू आहे. यंदा स्वत: जाऊन डाळिंब विकले़ यावेळी उचांकी दर प्रति किलो १०५ रुपये मिळाला, असे चोपडे यांनी सांगितले.

शेती हा फायदेशीर व्यवसाय- आपण शिक्षक असताना शेतीकडे कसे वळलात असे विचारले असता अंकुश चोपडे म्हणाले, शेती हा फायद्याचा व्यवसाय आहे़ मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे़ तसेच शेतमजुरांना व्यवस्थित हाताळले तर तेसुद्धा प्रामाणिकपणे शेतात काम करतात़ आपल्या गैरहजेरीत पिकांना कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने लक्ष ठेवतात़ परिणामी शेती फायदेशीर ठरते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSchoolशाळाTeacherशिक्षकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार