शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

देशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 2:14 PM

‘लोकमत’ शी साधला संवाद; १ टक्के लोकांकडे आहे ५८ टक्के संपत्ती

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे - अच्युत गोडबोलेदेशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत - अच्युत गोडबोले

सोलापूर : जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर याचा फायदा खूप कमी लोकांना झाला़ जागतिकीकरणामुळे आपले लक्ष फक्त शहराकडे गेले. यामुळे रोजगार वाढला नाही, जीडीपीमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही़ यामुळेच बेकारी, विषमता, प्रदूषण हे तीन राक्षस निर्माण झाले. याचाच परिणाम विकासावर होत आहे़ आज देशात १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे़ तर नऊ लोकांकडे असलेली संपत्ती देशातील ५० टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त आहे़ अशा घटकामुळे विषमता वाढत आहे़ ही वाढती विषमता ही मंदीचे कारण आहे असे मत साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने किर्लोस्कर सभागृह येथे भारताची विकासनीती वास्तव व धोका या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संगणक अभ्यासक अतुल कहाते यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत येळेगावकर उपस्थित होते.

गोडबोले पुढे म्हणाले, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यावर पुरेसा खर्च करण्याबरोेबर वीज, पाणी आदी सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा सर्वांगीण विकास होय़ विकासामध्ये पर्यावरण हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे़ विकासाकडे पाऊल ठेवताना आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जागतिकीकरणाचा फायदा खूप कमी लोकांना झाला आहे़ सरकारी आकडेवारीनुसार देशात ८.१ टक्के लोक बेरोजगार आहेत़ पण रोजगार संबंधी खूप कमी लोक नाव नोंदणी करत असतात़ देशात ९३ टक्के असुरक्षित  कामगार आहेत़ त्यांना उद्या आपण कुठे काम करणार आहेत याची माहितीही नसते. याचबरोबर आरोग्यासंबंधित जागृतीही नसणाºयांची संख्याही खूप कमी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणावर कमी खर्च ...- शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे. यामुळेच देशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत, शाळेचे शिक्षण पूर्ण केलेले १५.७ टक्के लोक आहेत. पदवीधर शिक्षण घेतलेले ४.५ टक्के लोक आहेत. द्विपदवीधर हे १.१ टक्के लोक आहेत तर २०१७ च्या आकडेवारीनुसार ७० टक्के शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. ४० टक्के शाळांमध्ये मैदान नाही, अशी माहिती अच्युत गोडबोले यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारतAchyut Godboleअच्युत गोडबोले