शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

ठिबक अनुदानासाठी शासनाने १८ कोटी दिले शेतकºयांनी केवळ ७४ लाख मागितले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:14 IST

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ ...

ठळक मुद्दे३६ कोटींचा आराखडा मात्र अनुदानासाठी प्रस्ताव मात्र येईनातठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली व १७ कोटी ६५ लाख रुपयेही आले असले तरी अनुदानासाठी अवघे ७४ लाख रुपयांचेच प्रस्ताव आले आहेत.

शासन पाणी वाचवा असा प्रचार करते. एकीकडे शासन शेतीपिके ठिबकवरच करण्यास सांगते, मात्र त्यासाठी पुरेशी रक्कम दिली जात नाही, अशा अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत. सरकार दरबारी ही परिस्थिती बदलेल की नाही?, असे वाटते मात्र परिस्थिती बदललेली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ठिबकसाठी ३६ कोटी रुपये खर्च होईल, असे गृहीत धरुन आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. या आराखड्यापैकी केंद्र शासनाकडून ५ कोटी व राज्य शासनाकडून १२ कोटी ६५ लाख रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाले आहेत. 

हे १७ कोटी ६५ लाख रुपय खर्च केला तर उर्वरित रक्कमही शासनाकडून मिळणार आहे. मात्र ही रक्कम खर्च होत नाही. आलेल्या प्रस्तावांपैकी तपासणी करुन पात्र असलेल्या ४२१ प्रस्तावांनुसार अनुदान वर्ग करण्यासाठी कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव दिले आहेत. या ४२१ प्रस्तावांसाठी ७४ लाख रुपये खर्च होणार आहेत. 

फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात फारशी रक्कम खर्च होईल, असेही सांगता येत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. यामुळे आलेली रक्कमच खर्च होण्याची शक्यता नसल्याने आराखड्यातील उर्वरित रक्कम मिळणार नाही.

अशी आहे सद्यस्थिती..

  • - ठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल झाले.
  • - तपासणीत विविध कारणांमुळे ३१२ प्रस्ताव अनुदानासाठी अपात्र ठरले.
  • - अनुदानासाठी ६ हजार ८२२ प्रस्ताव पात्र ठरले.
  • - ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली.
  • - ठिबक संच बसवून २१२९ शेतकºयांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले.
  • - त्यापैकी प्रत्यक्षात १२५८ संचाची तपासणी करून ४२१ प्रस्तावांचे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 दुष्काळाचा मोठा फटका ठिबक योजनेला बसला आहे. पाणी नसल्याने शेतकरी ठिबक करण्यास धजत नाहीत. जिल्ह्यात दरवर्षी ठिबकसाठी लागणारी रक्कम लक्षात घेऊन शासनाने अगोदरच पैसे उपलब्ध केले आहेत. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ