शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

ठिबक अनुदानासाठी शासनाने १८ कोटी दिले शेतकºयांनी केवळ ७४ लाख मागितले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:14 IST

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ ...

ठळक मुद्दे३६ कोटींचा आराखडा मात्र अनुदानासाठी प्रस्ताव मात्र येईनातठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली व १७ कोटी ६५ लाख रुपयेही आले असले तरी अनुदानासाठी अवघे ७४ लाख रुपयांचेच प्रस्ताव आले आहेत.

शासन पाणी वाचवा असा प्रचार करते. एकीकडे शासन शेतीपिके ठिबकवरच करण्यास सांगते, मात्र त्यासाठी पुरेशी रक्कम दिली जात नाही, अशा अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत. सरकार दरबारी ही परिस्थिती बदलेल की नाही?, असे वाटते मात्र परिस्थिती बदललेली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ठिबकसाठी ३६ कोटी रुपये खर्च होईल, असे गृहीत धरुन आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. या आराखड्यापैकी केंद्र शासनाकडून ५ कोटी व राज्य शासनाकडून १२ कोटी ६५ लाख रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाले आहेत. 

हे १७ कोटी ६५ लाख रुपय खर्च केला तर उर्वरित रक्कमही शासनाकडून मिळणार आहे. मात्र ही रक्कम खर्च होत नाही. आलेल्या प्रस्तावांपैकी तपासणी करुन पात्र असलेल्या ४२१ प्रस्तावांनुसार अनुदान वर्ग करण्यासाठी कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव दिले आहेत. या ४२१ प्रस्तावांसाठी ७४ लाख रुपये खर्च होणार आहेत. 

फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात फारशी रक्कम खर्च होईल, असेही सांगता येत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. यामुळे आलेली रक्कमच खर्च होण्याची शक्यता नसल्याने आराखड्यातील उर्वरित रक्कम मिळणार नाही.

अशी आहे सद्यस्थिती..

  • - ठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल झाले.
  • - तपासणीत विविध कारणांमुळे ३१२ प्रस्ताव अनुदानासाठी अपात्र ठरले.
  • - अनुदानासाठी ६ हजार ८२२ प्रस्ताव पात्र ठरले.
  • - ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली.
  • - ठिबक संच बसवून २१२९ शेतकºयांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले.
  • - त्यापैकी प्रत्यक्षात १२५८ संचाची तपासणी करून ४२१ प्रस्तावांचे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 दुष्काळाचा मोठा फटका ठिबक योजनेला बसला आहे. पाणी नसल्याने शेतकरी ठिबक करण्यास धजत नाहीत. जिल्ह्यात दरवर्षी ठिबकसाठी लागणारी रक्कम लक्षात घेऊन शासनाने अगोदरच पैसे उपलब्ध केले आहेत. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ