शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:31 IST

श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मुळेगाव तांडा येथे बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

सोलापूर : सरकारने सर्व समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखविले आहे. बौध्द, मातंग, बंजारा यासारख्या समाजासाठी असणाऱ्या विकासाच्या योजना सरकारने बंद केल्या आहेत. उध्दव ठाकरे म्हणाले होते, गाजराची पुंगी करून वाजवायलाही सरकारकडे पैसे नाहीत, तेच खरे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मुळेगाव तांडा येथे बंजारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे होते. खा. चव्हाण म्हणाले, मागासवर्गीय व वंचितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाकडून चालविण्यात येणाºया अनेक योजना सरकारने बंद केल्या आहेत. आज गतीने विकासकामांसाठी दगडं रचली जात आहेत. मात्र सरकारकडे पैसाच नसल्याने ही दगडं निवडणुकीनंतर तशीच राहणारी आहेत. पाच वर्षांतबेरोजगारांना नोकºया देता आल्या नाहीत, आता सांगतात की, चहा, भजी विका. पण युवकांनी शिक्षण घेतले आहे काय? असा सवाल चव्हाण यांनी केला.आघाडीचे चित्र आठ दिवसांत स्पष्ट होईलउस्मानाबाद : काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांनीही सहभागी व्हावे, यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. परंतु, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ‘सीपीएम’ही आघाडीत येण्यास इच्छूक आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत संपूर्ण आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे खा. अशोक चवहाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणSolapurसोलापूर