शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आरक्षणाविना सरकार निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही - नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 10:56 IST

बार्शीत मराठा आरक्षण मेळावा, नोव्हेंबरच्या अधिवेशनाची वाट पाहू

ठळक मुद्देसरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे - आ. नितेश राणेसंभाजीराजांची बदनामी करणाºयांना राज्यात फिरूच कसे देतात? - आ. नितेश राणे

बार्शी : मराठ्यांनी आजवर ५८ मूक मोर्चे शांततेत काढून अख्ख्या महाराष्ट्राला व सरकारला आपली ताकद दाखवली आह़े आता नोव्हेंबरमध्ये होणाºया विधिमंडळाच्या अधिवेशनाची वाट पाहत आहोत़ त्यानंतरही आरक्षण न दिल्यास निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस कोणतेच सरकार करणार नाही, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.

बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, डॉ़ प्रतापसिंह पाटील, राजेंद्र मिरगणे, रणवीर राऊत, अविनाश मांजरे ,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, संजय पाटील- घाटणेकर आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले, आज मराठा समाजाची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती बिकट आहे. समोरच्यास जी भाषा समजते त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे असे राणे म्हणाले. 

मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले याचे दु:ख आहे. आत्महत्येपेक्षा मराठा मावळ्यांनी शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. समोरची व्यक्ती ज्या विचाराने लढतेय, त्याच विचाराने लढले पाहिजे. आत्महत्या करू नये, आमदारांच्या राजीनाम्याचे फॅड योग्य नाही. असे ते म्हणाले. राजेंद्र राऊत म्हणाले, तालुक्यात मराठा समाज पक्षविरहीत काम करताना आरक्षण मागणीसाठी एकत्र आला आहे. तालुक्यातून मागासवर्ग आयोगाकडे फॉर्म भरण्याचे सर्वाधिक काम झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 प्रतापसिंह पाटील यांनी  सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे अशी मागणी केली़ अ‍ॅड़ सिध्देश्वर नाद्रे-पाटील यांनीही पुण्यातील आरक्षण हक्क परिषदेला येण्याचे आवाहन केले़ 

मावळ्यांवरील केस कायम - संभाजीराजांची बदनामी करणाºयांना राज्यात फिरूच कसे देतात? वादग्रस्त वक्तव्ये करणाºया भिडेंवरील केसेस मागे घेतात, मात्र मराठा मावळ्यांवरील केसेस काढल्या जात नाहीत, असा आरोप राणे यांनी केला.

टॅग्स :SolapurसोलापूरNitesh Raneनीतेश राणे marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण