शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Good News; पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेला मिळाले साडेतीन कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:31 IST

लॉकडाऊन काळातही फायदा; ११५२ टन औषधांसह जीवनावश्यक औषधांचा पुरवठा

ठळक मुद्देलॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील.

सुजल पाटील

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्याच्या माध्यमातून मध्य रेल्वेने माल वाहतुकीच्या माध्यमातून ३.६४ कोटींचे उत्पन्न मिळवले. ११५२ टन औषधांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून कोरोना वॉरियर्स म्हणून अधिकारी, चालक व अन्य टीमने आपले योगदान दिल्याचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.

 भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्या चालविण्याव्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या धावत आहेत. दरम्यान ५ जून २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक ते नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी ९७५५ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांमधून पाठविल्या आहेत. लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यामुळे गरज लक्षात घेता शालिमार व चेन्नईसाठी पार्सल गाड्या ३० जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हा माल पाठविला पार्सल गाडीद्वारे...- या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी ३३३६ टन खाद्यपदार्थ / पेरीशेबल आणि ५०८० टन हार्ड पार्सलची वाहतूक केली आहे. या साथीच्या आजारात औषधे/फार्मा उत्पादनांचा पुरवठा करणे हे देखील एक आव्हानात्मक काम होते. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने ११५२ टन औषधे / फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतुकीत ९७ टन पोस्टल / आरएमएस बॅग आणि ८९ टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे. 

लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील. ००११५ व ००११६ या पार्सल गाड्या दोन्ही दिशेने लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा येथे थांबतील.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग.  

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस