शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Good News; पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेला मिळाले साडेतीन कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:31 IST

लॉकडाऊन काळातही फायदा; ११५२ टन औषधांसह जीवनावश्यक औषधांचा पुरवठा

ठळक मुद्देलॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील.

सुजल पाटील

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्याच्या माध्यमातून मध्य रेल्वेने माल वाहतुकीच्या माध्यमातून ३.६४ कोटींचे उत्पन्न मिळवले. ११५२ टन औषधांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून कोरोना वॉरियर्स म्हणून अधिकारी, चालक व अन्य टीमने आपले योगदान दिल्याचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.

 भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्या चालविण्याव्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या धावत आहेत. दरम्यान ५ जून २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक ते नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी ९७५५ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांमधून पाठविल्या आहेत. लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यामुळे गरज लक्षात घेता शालिमार व चेन्नईसाठी पार्सल गाड्या ३० जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हा माल पाठविला पार्सल गाडीद्वारे...- या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी ३३३६ टन खाद्यपदार्थ / पेरीशेबल आणि ५०८० टन हार्ड पार्सलची वाहतूक केली आहे. या साथीच्या आजारात औषधे/फार्मा उत्पादनांचा पुरवठा करणे हे देखील एक आव्हानात्मक काम होते. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने ११५२ टन औषधे / फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतुकीत ९७ टन पोस्टल / आरएमएस बॅग आणि ८९ टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे. 

लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील. ००११५ व ००११६ या पार्सल गाड्या दोन्ही दिशेने लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा येथे थांबतील.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग.  

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस