शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ऊसशेतीला फाटा देत तीन एकरावरील द्राक्ष उत्पादनात मिळविले १६ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 10:40 IST

करकंब येथील शरद पांढरे या शेतकºयाची यशोगाथा; पाच टन केला बेदाणा

ठळक मुद्देपांढरे यांनी द्राक्ष पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात छाटणी केलीरोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली शिवाय उत्पादनातही घटतीन एकरांतून किमान ४० टन द्राक्ष अपेक्षित होते

शहाजी काळे करकंब : पारंपरिक ऊसशेतीला फाटा देऊन तीन एकर द्राक्ष शेतीतून तब्बल १६ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया करकंब (ता़ पंढरपूर) येथील एका शेतकºयाने साधली आहे़ नवनवीन प्रयोग, वेगवेगळ्या फवारण्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने १९ टन द्राक्षे तर ५ टन बेदाणा केला.

 अ‍ॅड. शरद पांढरे असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ पांढरे यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. वकिली व्यवसायाला बगल देत शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांची शेती उजनी डाव्या कालव्यालगत आहे़ सुरुवातीपासूनच त्यांचा उसाकडे कल होता़ त्यांना प्रयोगशील शेतीची आवड असल्याने विविध ठिकाणी     भेटी देऊन वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला़ नानासाहेब पर्पल या वाणाच्या द्राक्षाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली. नानासाहेब हे वाण जोखमीचे असून, या जातीला जास्तीच्या कीटकनाशक फवारणी व जास्तीचा उत्पादन खर्च करावा लागतो. परंतु उच्चशिक्षित व व्यवसायाने वकील असलेल्या पांढरे यांना शेतीमध्ये नवनवीन पिकांचा अभ्यास करून प्रयोगशील शेती करण्याचा छंद जडलेला.

त्यांनी नानासाहेब वाणाची जोखीम स्वीकारली. आॅक्टोबर महिन्यात द्राक्षाची पीक छाटणी केली. त्यानंतर सलग ५५ दिवस कमी-अधिक प्रमाणाचा पाऊस लागल्यामुळे नानासाहेब वाणाची जोखीम वाढली़ बागेवर दावण्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला़ त्यामुळे त्यांना अतिरिक्त एक लाख रुपयांच्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. त्यांना द्राक्षातून किमान ४० टन उत्पादन अपेक्षित होते. परंतु छाटणीनंतर सुरुवातीच्या काळात असलेल्या खराब हवामानामुळे द्राक्षाचा दर्जा घसरला तरी पांढरे   यांची असलेली महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि चिकाटी यामुळे २४ टन   उत्पादन घेण्यात यश मिळाले़  त्यापैकी त्यांनी १९ टनाचे मार्केटिंग केले़ उर्वरित ५ टन बेदाणा केला. तीन एकरांत उत्पादन घेण्यासाठी त्यांना पाच लाखांचा खर्च आला़ एकूण उत्पादनातून ५ लाख उत्पादन खर्च वजा जाता ११ लाख ५० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

सततच्या पावसाने १२ लाखांचे नुकसान- पांढरे यांनी द्राक्ष पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात छाटणी केली. परंतु आॅक्टोबर महिन्यात ५५ दिवस सतत पाऊस असल्यामुळे बागेवर दावण्यासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि संकट ओढावले. यावर मात करण्यासाठी पांढरे यांनी महागडी कीटकनाशक औषधे फवारणी करुन बाग जोपसण्याचा प्रयत्न केला. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली शिवाय उत्पादनातही घट झाली़ तीन एकरांतून किमान ४० टन द्राक्ष अपेक्षित होते. परंतु त्यामध्ये घट झाली आणि २४ टनावर समाधान मानावे लागले़ 

नानासाहेब हे वाण जोखमीचे असताना लागवडीपूर्वीच त्याचा अभ्यास केला होता. अनेक ठिकाणच्या अभ्यासदौºयात त्याचे फायदे-तोटे आणि लागवडीचे तंत्र अवगत केले होते. परिणामत: तीन एकरात्ां १६ लाखांचे द्राक्ष आणि बेदाणा घेता आला आणि याचे मार्केटिंगदेखील स्वत:च केले़यातून काही चांगले शिकताही आले़ - अ‍ॅड. शरद पांढरे, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात