पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट खचला; सहा जणांचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 17:17 IST2020-10-14T17:17:17+5:302020-10-14T17:17:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट खचला; सहा जणांचा दुदैवी मृत्यू
पंढरपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचल्याची दुर्घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली़ या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
गोपाळ लक्ष्मण अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव, पिल्लू उमेश जगताप (वय १२) यांच्यासह अन्य दोन महिला अशी नावे आहेत़ दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळाची पाहणी केली होती. प्रशासनाकडून अद्यापही शोधकार्याचे काम सुरू आहे़ जोपर्यंत कारवाई होणार नाही, चंद्रभागा घाटाचे काम करणाºया ठेकेदारांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कोळी समाजाचे प्रमुख गणेश अंकुश यांनी घेतला आहे.