शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:22 IST

करमाळ्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीरसभा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराासाठी सोलापूर दौºयावर- प्रचार सभेदरम्यान भाजप-शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर आंबेडकरांनी टीका- वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला

करमाळा : गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजप-सेनेचे सरकार आपले नव्हते. आपले सरकार कोणाला म्हणावयाचे ? जे सरकार सत्तेवर आल्यावर संकटाच्या वेळी जनतेसाठी धावून येते. गेल्या पाच वर्षांत राज्यामध्ये ज्या ज्या वेळी जनतेवर संकटे आली त्या वेळी हे सरकार धावून आले नाही. या सरकारसमोर विकासाचा कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

करमाळा येथे आले असता आंबेडकर बोलत होते.  प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नालायक आहेत, हे खरे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काय केले ते सांगा, असा भाजप-शिवसेनेला टोला लगावला़ तुमच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फक्त देशभक्तीच्या गप्पा मारत देशातील जनतेला वेठीस धरून त्यांची पिळवणूक करत आहात. देशातील व राज्यातील विरोधक संपविण्याचे काम एका बाजूला तुम्ही करत असताना दुसºया बाजूला चळवळीमध्ये काम करणाºया व्यक्तींवर खोटेनाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहात, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी नाहक टाटा व बिर्ला यांना विकण्याचे काम करण्यात आलेले आहे. धरण त्यांनी जरी बांधलेले असले तरी पाणी मात्र आमच्या हक्काचे आहे, असेही आंबेडकर म्हणाले़ यावेळी अतुल खुपसे, अ‍ॅड. विजय मोरे, सुभाष ओहोळ, देवा लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीkarmala-acकरमाळा