शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक ...

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम बनले. गणेशोत्सवाने समाजातले विविध घटक एकत्र आणले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भेदाभेद मिटवायचा प्रयत्न केला; पण परिस्थिती बदलली की, माणसाने बदलावे असे म्हणतात. इथे तर सगळेच बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमटाला, भपकेपणा, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. यामुळे कुठेतरी टिळकांच्या गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश हरवत गेला. आज उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

सध्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक इव्हेंट म्हणून होऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नव्हे, तर तो राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडेल, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे; परंतु आज सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांनी माणसामाणसांतील संवाद संपवला आहे. उत्सवातील झगमगाटावर वाढत चाललेला नाहक खर्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तसेच थर्माकोलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न असेल आणि जागोजागी तर नवसाला पावणारे बाप्पा उभे राहिले आहेत. हे पाहिल्यावर टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

स्वातंत्र्याअगोदर व नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. अवयवदान, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्याविरोध यासारखे विषय उत्सवाद्वारे समाजापुढे मांडावेत. वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये गोळा करून मोठमोठी आरास, देखावे, झगमगाट करण्यापेक्षा समाजासाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास जनतेलाच फायदाच होईल. वेगवेगळ्या देवस्थानांना करोडो रुपयांची देणगी दरवर्षी जमा होते. त्यातूनच सामाजिक बांधीलकी जपत पूरक्षेत्रात काम करता येईल. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल, ऑक्सिजनची माणसाला किंमत कळली. ते निर्माण करू शकतो. गरिबांना मदत, वाचन केंद्र, अपंगांना मदत, विधायक कामांसाठी शालेय प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण, समाजातील गुणवंतांचा सत्कार, तसेच यातून स्थानिक सामुदायिक विवाह सोहळे, तरुणांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत, अशा पद्धतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा गणेशोत्सव लोकमान्यांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असेल.

-प्रा. तात्यासाहेब काटकर

(लेखक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.)