शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक ...

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम बनले. गणेशोत्सवाने समाजातले विविध घटक एकत्र आणले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भेदाभेद मिटवायचा प्रयत्न केला; पण परिस्थिती बदलली की, माणसाने बदलावे असे म्हणतात. इथे तर सगळेच बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमटाला, भपकेपणा, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. यामुळे कुठेतरी टिळकांच्या गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश हरवत गेला. आज उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

सध्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक इव्हेंट म्हणून होऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नव्हे, तर तो राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडेल, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे; परंतु आज सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांनी माणसामाणसांतील संवाद संपवला आहे. उत्सवातील झगमगाटावर वाढत चाललेला नाहक खर्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तसेच थर्माकोलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न असेल आणि जागोजागी तर नवसाला पावणारे बाप्पा उभे राहिले आहेत. हे पाहिल्यावर टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

स्वातंत्र्याअगोदर व नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. अवयवदान, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्याविरोध यासारखे विषय उत्सवाद्वारे समाजापुढे मांडावेत. वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये गोळा करून मोठमोठी आरास, देखावे, झगमगाट करण्यापेक्षा समाजासाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास जनतेलाच फायदाच होईल. वेगवेगळ्या देवस्थानांना करोडो रुपयांची देणगी दरवर्षी जमा होते. त्यातूनच सामाजिक बांधीलकी जपत पूरक्षेत्रात काम करता येईल. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल, ऑक्सिजनची माणसाला किंमत कळली. ते निर्माण करू शकतो. गरिबांना मदत, वाचन केंद्र, अपंगांना मदत, विधायक कामांसाठी शालेय प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण, समाजातील गुणवंतांचा सत्कार, तसेच यातून स्थानिक सामुदायिक विवाह सोहळे, तरुणांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत, अशा पद्धतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा गणेशोत्सव लोकमान्यांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असेल.

-प्रा. तात्यासाहेब काटकर

(लेखक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.)