शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक ...

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम बनले. गणेशोत्सवाने समाजातले विविध घटक एकत्र आणले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भेदाभेद मिटवायचा प्रयत्न केला; पण परिस्थिती बदलली की, माणसाने बदलावे असे म्हणतात. इथे तर सगळेच बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमटाला, भपकेपणा, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. यामुळे कुठेतरी टिळकांच्या गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश हरवत गेला. आज उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

सध्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक इव्हेंट म्हणून होऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नव्हे, तर तो राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडेल, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे; परंतु आज सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांनी माणसामाणसांतील संवाद संपवला आहे. उत्सवातील झगमगाटावर वाढत चाललेला नाहक खर्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तसेच थर्माकोलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न असेल आणि जागोजागी तर नवसाला पावणारे बाप्पा उभे राहिले आहेत. हे पाहिल्यावर टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

स्वातंत्र्याअगोदर व नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. अवयवदान, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्याविरोध यासारखे विषय उत्सवाद्वारे समाजापुढे मांडावेत. वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये गोळा करून मोठमोठी आरास, देखावे, झगमगाट करण्यापेक्षा समाजासाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास जनतेलाच फायदाच होईल. वेगवेगळ्या देवस्थानांना करोडो रुपयांची देणगी दरवर्षी जमा होते. त्यातूनच सामाजिक बांधीलकी जपत पूरक्षेत्रात काम करता येईल. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल, ऑक्सिजनची माणसाला किंमत कळली. ते निर्माण करू शकतो. गरिबांना मदत, वाचन केंद्र, अपंगांना मदत, विधायक कामांसाठी शालेय प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण, समाजातील गुणवंतांचा सत्कार, तसेच यातून स्थानिक सामुदायिक विवाह सोहळे, तरुणांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत, अशा पद्धतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा गणेशोत्सव लोकमान्यांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असेल.

-प्रा. तात्यासाहेब काटकर

(लेखक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.)