शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लोकमान्यांना अभिप्रेत गणेशोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक ...

जनतेची स्वाभाविक उत्सवप्रियता आणि उत्सवाचे धार्मिक स्वरूप ही दोन कारणे हा उत्सव लोकप्रिय करण्यामागे असली तरी या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रसार करण्याचे ते एक माध्यम बनले. गणेशोत्सवाने समाजातले विविध घटक एकत्र आणले. लोकमान्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून भेदाभेद मिटवायचा प्रयत्न केला; पण परिस्थिती बदलली की, माणसाने बदलावे असे म्हणतात. इथे तर सगळेच बदलले. श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आणि झगमटाला, भपकेपणा, दिखाऊपणाला प्रतिष्ठा आली. यामुळे कुठेतरी टिळकांच्या गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश हरवत गेला. आज उत्सव साजरा करताना लोकहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष व्हावे, यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

सध्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात एक इव्हेंट म्हणून होऊ लागली. सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नव्हे, तर तो राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आहे. माणूस जोडला तर राष्ट्र जोडेल, असे लोकमान्य टिळकांना वाटत असे; परंतु आज सोशल मीडिया, दूरचित्रवाहिन्यांनी माणसामाणसांतील संवाद संपवला आहे. उत्सवातील झगमगाटावर वाढत चाललेला नाहक खर्च आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, तसेच थर्माकोलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्न असेल आणि जागोजागी तर नवसाला पावणारे बाप्पा उभे राहिले आहेत. हे पाहिल्यावर टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

स्वातंत्र्याअगोदर व नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचे एक चांगले व्यासपीठ होते. अवयवदान, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्याविरोध यासारखे विषय उत्सवाद्वारे समाजापुढे मांडावेत. वर्गणीच्या स्वरूपात लाखो रुपये गोळा करून मोठमोठी आरास, देखावे, झगमगाट करण्यापेक्षा समाजासाठी त्या पैशांचा विनियोग केल्यास जनतेलाच फायदाच होईल. वेगवेगळ्या देवस्थानांना करोडो रुपयांची देणगी दरवर्षी जमा होते. त्यातूनच सामाजिक बांधीलकी जपत पूरक्षेत्रात काम करता येईल. कोरोनाच्या काळात हॉस्पिटल, ऑक्सिजनची माणसाला किंमत कळली. ते निर्माण करू शकतो. गरिबांना मदत, वाचन केंद्र, अपंगांना मदत, विधायक कामांसाठी शालेय प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण, समाजातील गुणवंतांचा सत्कार, तसेच यातून स्थानिक सामुदायिक विवाह सोहळे, तरुणांना लघुउद्योगासाठी आर्थिक मदत, अशा पद्धतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारा गणेशोत्सव लोकमान्यांना खऱ्या अर्थाने अभिप्रेत असेल.

-प्रा. तात्यासाहेब काटकर

(लेखक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत.)