शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

ST कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा फुल्ल सपोर्ट, आक्रोश मोर्चातून सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:13 IST

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले.

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन सुरु आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दिड महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीची सेवा पुर्णता कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवासांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासांची लुट होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला जोर देत मनसेनं संपकरी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. सोलापुरात मनसेनं आज आक्रोश मोर्चा काढून सरकाविरुद्ध आवाज उठवल्याचे दिसून आले.  

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तसेच, कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले. तरी देखील कर्मचारी एसटी विलिनीकरणाच्या आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, काहीही झालं तरी विलिगीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेला आता मनसेनं फुल्ल सपोर्ट दिला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे यासाठी संप, उपोषण ,जागरण आंदोलन सुरु आहे. मात्र, निद्रा अवस्थेत असण्याऱ्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मनसैनिक हजर होते. 

परब यांनी कर्मचाऱ्यांना दिला इशारा

एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी मेस्मा कायदा लावता येऊ शकतो. त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत सांगितले. कोणी नेता नसल्याने संपकरी कर्मचारी भरकटले आहेत. त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते त्यांना सांगत आहेत की २० तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होईल. पण ते हे कशाच्या आधारे बोलत आहेत, हे माहिती नाही. त्या दिवशी न्यायालयाला समितीचा अहवाल सादर होईल. निर्णय होणार नाही, असेही मंत्री परब म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेST Strikeएसटी संपPandharpurपंढरपूरSolapurसोलापूर