शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वडिलांसमोरच शेतकरी मुलाला वाहनाने चिरडले; शेळगी पुलावरील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 13:06 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : शेतातील भाजी विकण्यासाठी मार्केट यार्डात येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरल्याने गुळवंची येथील ३५ वर्षीय महादेव बाळासाहेब कदम या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात वडील बाळासाहेब यांच्या समोर झाला.

शेळगी पुलावर राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने रस्ते दुरुस्तीसाठी खडबडीत करण्यात आले आहे. रस्ता दुरुस्तीचा इशारा देणारा फलक नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला. महादेव कदम हे नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांसोबत शेतातील माल विक्री करण्यासाठी सोलापूर मार्केट यार्ड येथे रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून येत होते. शेळगी पुलावर रस्ता खडबडीत करण्यात आला आहे. या ठिकाणी महादेव यांचे वडील बाळासाहेब हे दुचाकीवरून पडले.

काहींनी त्यांना पाहिले. त्यांनी लगेच आपली गाडी बाजूला लावत वडिलांना तेथून उचलले. पुन्हा मागच्या बाजूस लावलेली आपली गाडी घेण्यासाठी वळाले. त्याच वेळी अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले. ती घटना एवढी जलद घडली की कोणत्या वाहनाने महादेव यांना ठोकरले हे कळालेच नाही. महादेव यांचे वडील बाळासाहेब यांनी लगेच गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने महादेव यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मदतीची मागणी

महादेव हे कष्टाळू होते. हे नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून येत होते. ते शेती बरोबर, कपाट दुरुस्तीचे कामही करत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि तीन मुली आहेत. कदम यांच्या कुटुंबीयांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

महामार्गाची दुरुस्ती करताना त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दिवसभरात तेथे वीस पेक्षा जास्त शेतकरी व सामान्य नागरिक दुचाकीवरून पडले. यामुळेच गुळवंचीतील तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित कर्मचारी आणि कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पोळ यांनी दिला आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाFarmerशेतकरीagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी